शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

भू-संपादन कायद्यातील त्रुटींमुळे प्रकल्प रखडले

By admin | Updated: July 16, 2015 02:00 IST

पणजी : २०१३ साली केंद्रातील यूपीए सरकारने भू-संपादन कायद्यात केलेल्या तरतुदींमुळे व ठेवलेल्या त्रुटींमुळे गोव्यातील काही पूल व

पणजी : २०१३ साली केंद्रातील यूपीए सरकारने भू-संपादन कायद्यात केलेल्या तरतुदींमुळे व ठेवलेल्या त्रुटींमुळे गोव्यातील काही पूल व अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भू-संपादन रखडले आहे. त्यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने आणलेल्या भू-संपादन कायद्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलविलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत देशातील अनेक मुख्यमंत्री सहभागी झाले. पार्सेकर यांनीही त्या बैठकीत भाग घेतला. मोदी सरकारचा भू-संपादन कायदा लोकसभेत मंजूर झाला; पण राज्यसभेत त्यास अजून मंजुरी मिळालेली नाही. त्यावर लवकर उपाय काढला जावा, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांचेही मत आहे. बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सांतआंद्रे मतदारसंघात यापूर्वीच्या सरकारने एक पूल बांधून ठेवला आहे; पण त्याला जोडरस्ते बांधण्यासाठी भू-संपादन करता येत नाही. कामुर्ली-तुये पुलाबाबतही भू-संपादन होत नाही. अन्य काही पूल व रस्त्यांची स्थिती अशी आहे. जमिनीशीसंबंधित ८० टक्के लोकांची मान्यता घ्यावी लागते. अशा पद्धतीने विकास होणार नाही. दरम्यान, तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी आणि चिंबल येथे आयटी पार्क उभे करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)