शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, विशेष समितीकडून सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2024 11:19 IST

विशेष समितीने राज्यभर फिरुन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात तिसरा जिल्हा करण्याच्या प्रक्रियेला सरकारने सुरुवात केली आहे. यासाठी नियोजन आणि सांख्यिकी खात्यातंर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती भौगोलिक गोष्टीचा आढावा घेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

विशेष समितीने राज्यभर फिरुन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तिसरा जिल्हा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, परंतु हे करताना केवळ एक किंवा दोन मुद्दे लक्षात घेऊन जिल्हा तयार करू शकत नाही. जिल्हा तयार करताना चारही बाजूने विचारा करावा लागतो. लोकसंख्या, आर्थिक व्यवस्था, प्रशासन, साधनसुविधा व लोकांची मते महत्वाची आहेत. तिसऱ्या जिल्ह्यामुळे लोकांचा विकास व्हावा हाच मुख्य हेतू आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. मागासवर्गीय लोकांच्या आधारे तिसरा जिल्हा अस्तित्वात यावा हे चुकिचे आहे. लोक मागासवर्गीय नाहीत तर तालुका मागासवर्गीय आहे. मागासवर्गीय म्हणजे जिथे बऱ्यापैकी साधनसुविधा नाहीत. तालुक्यासोबत लोकांचा विकास व्हावा हाच विचार आहे. येथे नवीन प्रशासकीय इमारत येणार आहे. समितीने एकदा अहवाल सादर केला की नंतर सर्व आमदारांना विश्वासात घेऊन पुढची वाटचाल ठरविण्यात येणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले

फोंडा तिसरा जिल्हा करावा : गावकर

सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर यांनी शुक्रवारी अधिवेशनात तिसऱ्या जिल्ह्यासंदर्भात खासगी ठराव मांडला. यावेळी डॉ. गावकर यांनी सांगितले की, फोंडा, साखळी, प्रियोळ, शिरोडा, सावर्डे असे मतदारसंघ मिळून तिसरा जिल्हा करण्याचा सरकारचा विचार होता. तर फोंड्यात याचे मुख्यालय असणार आहे.

सभापतींना केपेत हवे तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय

आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या ठरावाला पाठींबा देताना लेश काब्राल यांनी मात्र फोंड्यातील मुख्यालयाला विरोध केला, फोंडा जर मागासवर्गीय आहे तर आम्ही सुपर मागासवर्गीय आहोत. त्यामुळे केपे किंवा सावर्डेत याचे मुख्यालय व्हावे, अशी इच्छा व्यक्त्त केली. या चर्चेत सभापती रमेश तवडकर यांनी देखील भाग घेत काणकोण, केपे, सावर्डे मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या जिल्ह्यात या मतदारसंघाचा विचार व्हायला हवा. तसेच केपे येथे मुख्यालय करावे, अशी सूचना केली.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत