शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

जनतेच्या अपेक्षापूर्तीस प्राधान्य: मुख्यमंत्री, साखळीतील जनता दरबाराला मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2024 12:58 IST

जनता दरबाराला दररोज चारशे-पाचशे लोक येतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्य व केंद्र सरकारने प्रत्येक घरात समृद्धीचा ध्यास घेतला आहे. अनेक योजना, अनेक उपक्रम हाती घेत मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या सरकारप्रती जनतेच्या अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साखळीत शनिवार-रविवार जनता दरबारात लोक मोठ्यासंख्येने उपस्थित राहतात. त्यांचे प्रश्न सोडवण्याला विशेष प्राधान्य असते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

रविवारी सकाळी मुख्यमंत्री सावंत यांनी रवींद्र भवनमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. ते शनिवारी रात्री दिल्ली दौऱ्यावरून परतले होते. जी कामे लोक घेवून येतात, त्यांचा शक्यतो त्याच ठिकाणी पाठपुरावा केला जातो. नोकरी, बदली, विकास कामे, तक्रारी, कौतुक, आर्थिक मदत त्याचबरोबर सोयरिक जुळवून देण्याची मागणी करणारे, नोकरीची ऑर्डर मिळालेलं लोक मिठाईदेखील घेवून येतात.

जनता दरबाराला दररोज चारशे-पाचशे लोक येतात. मात्र, मुख्यमंत्री जनता दरबार कधीही अर्ध्यावर लोकांना सोडत नाहीत. प्रत्येकाला भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतात. त्यामुळे लोकांची अपेक्षा वाढत आहेत. 

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून वार्षिक अंदाज पत्रक सादर करणे, पंतप्रधान मोदी यांची मंगळवारी मडगावात होणारी सभा तसेच इतर अनेक कामत व्यस्त असूनही मुख्यमंत्री वेळ काढत असतात. रोज सकाळी आपल्या साखळीतील निवासस्थानी तासभर लोकांना भेटतात. राज्यातील शेकडो लोकांना कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखतात त्यामुळे जनतेशी समरस झालेला मुख्यमंत्री अशी त्यांची ख्याती असल्याचे कालिदास गावस, कुंदन फळारी, तुळशीदास परब, भगवान हरमलकर यांनी सागितले. सहज उपलब्ध होणारा व लोकांच्या प्रती तळमळ असलेला मुख्यमंत्री अशी त्यांची कीर्ती असल्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.

या संदर्भात मुख्यमंत्री सावंत यांना १८ तास काम करण्याची ऊर्जा कुठून येते असे विचारले असता ते म्हणाले, जनतेचे प्रेम व विकासाला मिळणारी चालना, प्रगतीच्या दिशेने असलेले मार्गक्रमण तसेच कार्यकर्ते लोकांबरोबर कायम मिसळणे, वावरत असतो हीच शक्ती आहे. मुख्यमंत्री खुर्ची मिळवण्यासाठी या पदावर नसून संपूर्ण गोमंतकीय जनतेच्या आशाआकाक्षा पूर्ण करणे, उत्तम प्रशासन, विकास साधने व 'आत्मनिर्भर स्वयंपूर्ण गोवा'चे स्वप्न साकारण्याचा ध्यास आहे. त्याला जनता, कार्यकर्त्यांची साथ मिळते हीच माझी शक्ती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सागितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत