शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

म्हापसा अर्बनची निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 20:19 IST

केंद्रीय सहकार निबंधकांनी म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने दिलेले राजीनामे स्वीकारण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर बँकेला केलेल्या सुचनेनुसार संचालक मंडळाने सर्व सदस्यांने राजीनामे स्वीकारले आहेत.

म्हापसा : केंद्रीय सहकार निबंधकांनी म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने दिलेले राजीनामे स्वीकारण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर बँकेला केलेल्या सुचनेनुसार संचालक मंडळाने सर्व सदस्यांने राजीनामे स्वीकारले आहेत. मंगळवारी घेण्यात आलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत राजीनामे स्वीकारण्यात आले असून नव्याने संचालक मंडळाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तसेच शक्य असल्यान बँकेचे इतर बँकेत विलीनीकरण करण्याची तयारी सुद्धा ठेवली आहे. 

सदर बैठक बँकेच्या प्रधान कार्यालयात घेण्यात आली. गेल्या महिन्यात ४ सप्टेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाने राजीनामे सादर केले होते. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी बँकेची आमसभा संपन्न झाली होती. दिलेले राजीनामे केंद्रीय निबंधकाने स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली होती. राजीनामे वैयक्तीक पातळीवर असल्याने ते स्वीकारण्याचा अधिकार आपल्याजवळ नसल्याचे बँकेला पाठवलेल्या पत्रात कळवले होते. त्यामुळे सदर राजीनाम्यावर संचालक मंडळाने योग्य तो निर्णय घ्यावा असेही त्यात सुचीत करण्यात आलेले. तसेच बँकेच्या पुन्हा निवडणूक घेवून नवीन संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळाला पदावर कायम राहण्याची सुद्धा विनंती म्हापसा अर्बनला करण्यात आलेली.  

राजीनामे स्वीकारले असते तर बँकेसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असता. संचालक मंडळाविना बँकेचे कामकाज सरव्यवस्थापकावर सोपवणे योग्य ठरणार नसते अशी माहिती अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांनी दिली. त्यातून बँकेच्या दैनंदिनी व्यवहारात पोकळीक निर्माण झाली असती. त्यामुळे राजीनाम्यावर योग्य तो निर्णय घेण्याची सुचना बँकेला करण्यात आली होती असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक अ‍ॅड. रमाकांत खलप तसेच संचालक मायकल कारास्को उपस्थित होते. 

या संबंधी पत्रकारांना माहिती देताना बँकेचे अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांनी संचालक मंडळाने सादर केलेले राजीनामे स्वीकारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच संचलक मंडळ निवडणुकीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. घेतलेले निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याते ते म्हणाले. या संबंधी रिझर्व्ह बँक, केंद्रीय सहकार निबंधक, केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच राज्यातील सहकार निबंधकांना कळवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसा पत्रव्यवहार त्यांच्याशी केला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. 

विद्यमान संचालक मंडळ नवीन संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत कायम राहणार असून इतर बँकात म्हापसा अर्बनाचे विलीनीकरण करण्याच्या पर्यायावर विचारही सुरु असून त्यावर निर्णय झाल्यास तसेच निवडणुकीपूर्वी विलीनीकरण शक्य होत असल्यास तसाही विचार केला जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.  

टॅग्स :goaगोवाbankबँक