शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

महागाईतही गोमंतकीयांमध्ये चतुर्थीचा उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:32 IST

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे.

ठळक मुद्देगोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत.

पणजी - महागाई वाढली, पुराच्या झळाही बसल्या, शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली, भाजी, दुध व पाण्याच्या तुटवडय़ाने लोक हैराण झाले. मात्र या स्थितीतही गोमंतकीयांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. गोमंतकीयांना अतिशय प्रिय असलेला गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. चतुर्थीनिमित्ताने बाजारपेठा फुलल्या आहेत.

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. घरे सजविली जात आहेत. रंगरंगोटी केली जात आहे. आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमी पार पडल्यानंतर गोमंतकीयांनी गणेशमूर्ती तयार होणाऱ्या शाळांमध्ये जाऊन आपली गणेशमूर्ती निवडली व आरक्षित केली. येत्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. ज्या कुटूंबांमध्ये दुरच्या अंतरावरून गणेशमूर्ती आणावी लागते, अशा कुटुंबाकडून मूर्ती आदल्या दिवशीच सायंकाळी घरी आणून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरोहितांना बोलावून मूर्तीची पुजा केली जाते व गणोशोत्सवाला आरंभ होतो. अनेक गोमंतकीयांच्या घरांमध्ये दीड व पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवात गोमंतकीय सहभागी होतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.

सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. बाजारपेठांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती सरकारने करून वाहतूक व्यवस्थेत बदलही घडवून आणले आहेत. चतुर्थीच्या दिवसांत काही भागांमध्ये चतुर्थीचा बाजार स्वतंत्रपणे अन्यत्र भरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात अलिकडेच महाराष्ट्रातील तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने पूर आला. लोकांना मोठा फटका बसला. कृषी क्षेत्राची दहा कोटींची हानी झाली. तत्पूर्वी बेळगाव व अन्य भागातून येणारा भाजीपाला कमी झाल्याने गोमंतकीयांना अत्यंत महागडी भाजी खावी लागली. दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता. जलवाहिनी फुटल्याने तिसवाडी व फोंडा तालुक्यातील काही भागांमध्ये आठ ते दहा दिवस नळ कोरडे पडले होते. लोकांनी सरकारच्या नावे बोटे मोडली. मात्र आता नव्या दमाने गोमंतकीय गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ लागला आहे. निदान चतुर्थीच्या काळात तरी सरकारने गोव्यातील पाणी व वीज पुरवठय़ाची नीट काळजी घ्यावी अशी गोमंतकीयांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :goaगोवाGanesh Mahotsavगणेश महोत्सव