शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महागाईतही गोमंतकीयांमध्ये चतुर्थीचा उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:32 IST

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे.

ठळक मुद्देगोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत.

पणजी - महागाई वाढली, पुराच्या झळाही बसल्या, शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली, भाजी, दुध व पाण्याच्या तुटवडय़ाने लोक हैराण झाले. मात्र या स्थितीतही गोमंतकीयांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. गोमंतकीयांना अतिशय प्रिय असलेला गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. चतुर्थीनिमित्ताने बाजारपेठा फुलल्या आहेत.

गोव्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही सध्या चतुर्थीचा माहोल दिसून येऊ लागला आहे. घरे सजविली जात आहेत. रंगरंगोटी केली जात आहे. आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमी पार पडल्यानंतर गोमंतकीयांनी गणेशमूर्ती तयार होणाऱ्या शाळांमध्ये जाऊन आपली गणेशमूर्ती निवडली व आरक्षित केली. येत्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. ज्या कुटूंबांमध्ये दुरच्या अंतरावरून गणेशमूर्ती आणावी लागते, अशा कुटुंबाकडून मूर्ती आदल्या दिवशीच सायंकाळी घरी आणून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरोहितांना बोलावून मूर्तीची पुजा केली जाते व गणोशोत्सवाला आरंभ होतो. अनेक गोमंतकीयांच्या घरांमध्ये दीड व पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवात गोमंतकीय सहभागी होतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याप्ती गोव्यात गेल्या पंधरा वर्षात वाढली आहे.

सध्या बाजारपेठांमध्ये चतुर्थीनिमित्ताने खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. बाजारपेठांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती सरकारने करून वाहतूक व्यवस्थेत बदलही घडवून आणले आहेत. चतुर्थीच्या दिवसांत काही भागांमध्ये चतुर्थीचा बाजार स्वतंत्रपणे अन्यत्र भरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात अलिकडेच महाराष्ट्रातील तिळारी धरणाचे पाणी सोडल्याने पूर आला. लोकांना मोठा फटका बसला. कृषी क्षेत्राची दहा कोटींची हानी झाली. तत्पूर्वी बेळगाव व अन्य भागातून येणारा भाजीपाला कमी झाल्याने गोमंतकीयांना अत्यंत महागडी भाजी खावी लागली. दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता. जलवाहिनी फुटल्याने तिसवाडी व फोंडा तालुक्यातील काही भागांमध्ये आठ ते दहा दिवस नळ कोरडे पडले होते. लोकांनी सरकारच्या नावे बोटे मोडली. मात्र आता नव्या दमाने गोमंतकीय गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ लागला आहे. निदान चतुर्थीच्या काळात तरी सरकारने गोव्यातील पाणी व वीज पुरवठय़ाची नीट काळजी घ्यावी अशी गोमंतकीयांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :goaगोवाGanesh Mahotsavगणेश महोत्सव