शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

टपाल मतदानाचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: March 7, 2017 01:45 IST

पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही टपाल मतपत्रिकांद्वारे सुरू असलेल्या मतदानाबाबत आरोप व तक्रारी येत असल्याने

टपाल मतदानाचे भवितव्य अधांतरीपणजी : विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही टपाल मतपत्रिकांद्वारे सुरू असलेल्या मतदानाबाबत आरोप व तक्रारी येत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने तातडीने मंगळवार, दि. ७ रोजी पणजीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. एकंदरीत, आतापर्यंतच्या टपाल मतदानाचे भवितव्यच अनिश्चित व अधांतरी बनले आहे.मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आल्तिनो येथील कार्यालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होईल. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारीही या बैठकीस उपस्थित असतील. टपालाद्वारे झालेले मतदान रद्द केले जावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश भोसले यांच्या शिष्टमंडळाने सर्व विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी, निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती व आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या शिष्टमंडळाला सोमवारी वेळ दिली होती. दुपारी साडेबारा वाजता आयोगाने चोडणकर व भोसले यांच्याकडून सर्व मुद्दे, अडचणी व समस्या ऐकून घेतल्या. एक तास त्यांनी चर्चा केली. आपण मांडलेल्या मुद्द्यांपैकी बहुतेक मुद्दे आयोगास पटल्याचे भोसले यांनी दिल्लीहून ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही टपाल मतदानाबाबत तसेच सिरीयल नंबरची माहिती बाहेर फोडली जात असल्याविषयी व अन्य विषयांबाबत ज्या काही शंका उपस्थित करत होतो, त्या शंका मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीत आयोगाकडे पोहोचवतच नव्हते, असाही आम्हाला आता दाट संशय येत असल्याचे भोसले म्हणाले.निवडणुकीची ड्युटी बजावलेल्या साडेसतरा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना मतपत्रिका दिल्या गेल्या. सरकारी कर्मचारी मुक्तपणे मतदान करूच शकत नाहीत. त्यांच्यावर दबाव येतो; कारण सिरीयल क्रमांक बाहेर फोडला गेला आहे. तो क्रमांक उमेदवारांना व आमदारांना कळल्यामुळे त्यांच्या मतदानाच्या गुप्ततेविषयीही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आतापर्यंतचे टपाल मतदान रद्द करून एकाच दिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे सर्व साडेसतरा हजार कर्मचाऱ्यांचे मतदान घ्या, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याचे चोडणकर यांनी बैठकीनंतर सांगितले. (खास प्रतिनिधी)