शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

पोर्तुगीजधार्जिणे मराठीला ठरतात अडसर: सुभाष वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:35 IST

दवर्ली येथे मडगाव प्रखंडाचा मराठी राजभाषा निर्धार मेळावा; मराठी वोटबॅक निर्माण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात अजूनही पोर्तुगीजधार्जिणे लोक अस्तित्वात असून ते मराठीला विरोध करत आहेत. त्यामुळे दोन वर्षात मराठी मतपेढी बळकट करून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी केले. मडगाव प्रखंडाच्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते.

दवर्ली येथील दुर्गा देवीच्या मंदिर सभागृहात शनिवारी संध्याकाळी मडगाव प्रखंडाचा मराठी राजभाषा निर्धार मेळावा झाला. व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वेलिंगकर म्हणाले, राज्यात मराठी संस्कृती, मराठी वर्तमानपत्रे, धार्मिक विधी, आरती, पूजा, पत्रव्यवहार हे सर्व मराठीतूनच होत आहे. असे असूनही मराठी भाषेवर अन्याय होत आहे.

वेलिंगकर यांच्या मराठी राजभाषा करण्याच्या प्रयत्नांना लोकांनी साथ द्यायला पाहिजे, असे मत यापूर्वी, गो.रा. ढवळीकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा ही संतांची भाषा असून ती एक समृद्ध भाषा असल्याचे ते म्हणाले. पूर्वी सर्वच ठिकाणी मराठीतूनच व्यवहार व्यायचा. कोंकणी जरी काही लोकांमुळे राजभाषा झाली तरीही ती कुठेही व्यवहारात वावरली जात नाही. आम्ही कोंकणी भाषेला बोली भाषाच मानतो, असे ढवळीकर म्हणाले.

तरच सरकारवर येईल दबाव

काही पोर्तुगीजधार्जिणे लोक अजूनही गोवा हा वेगळा प्रदेश म्हणतात. तो एक स्वतंत्र देशच म्हणून ओळखला जावा म्हणून काहींनी तर युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेला निवेदन, पत्रही लिहिले आहे. हेच लोक मराठी संस्कृतीला मारक ठरत आहेत. मराठी मतपेढी बळकट केल्यास सरकारवर मराठी राजभाषा करण्यास दबाव येईल.

युवकांचे मेळावे घेणार

वेलिंगकर यांनी, मडगाव प्रखंडातील मराठीप्रेमींना, जो पक्ष आणि उमेदवार मराठीला पाठिंबा देईल त्यालाच मतदान करायला आणि त्याच्याकडून मराठी राजभाषा करण्यास वचनबद्ध राहण्याची अट घालण्यास सांगितले. यापुढे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात युवकांची संमेलने होतील आणि मराठी ऐक्य साधले जाईल.

'रोमी ही भारतीय लिपीच नाही'

या कार्यक्रमात नंतर, मराठीप्रेमींनी मराठी राजभाषा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. यानंतर, पत्रकारांशी बोलताना वेलिंगकर म्हणाले की, सासष्टी तसेच दक्षिण गोव्यातील काही भागात कोंकणी रोमी लिपीला राजभाषा म्हणून स्थान मिळावे अशी चळवळ सुरू आहे. मुळात रोमी ही भारतीय लिपिच नाही आणि त्यामुळे त्या लोकांची ही मागणी चुकीची आहे. आम्ही रोमि लिपीला कदापि राजभाषा दर्जा देण्यास मान्य होणार नाही. मराठी भाषेमुळेच गोव्यात भारतीय संस्कृती टिकून आहे. त्यामुळे मराठी ही राजभाषा झालीच पाहिजे, असे वेलिंगकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाmarathiमराठीPoliticsराजकारण