शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

पोर्तुगीजधार्जिणे मराठीला ठरतात अडसर: सुभाष वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:35 IST

दवर्ली येथे मडगाव प्रखंडाचा मराठी राजभाषा निर्धार मेळावा; मराठी वोटबॅक निर्माण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात अजूनही पोर्तुगीजधार्जिणे लोक अस्तित्वात असून ते मराठीला विरोध करत आहेत. त्यामुळे दोन वर्षात मराठी मतपेढी बळकट करून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी केले. मडगाव प्रखंडाच्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात वेलिंगकर बोलत होते.

दवर्ली येथील दुर्गा देवीच्या मंदिर सभागृहात शनिवारी संध्याकाळी मडगाव प्रखंडाचा मराठी राजभाषा निर्धार मेळावा झाला. व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वेलिंगकर म्हणाले, राज्यात मराठी संस्कृती, मराठी वर्तमानपत्रे, धार्मिक विधी, आरती, पूजा, पत्रव्यवहार हे सर्व मराठीतूनच होत आहे. असे असूनही मराठी भाषेवर अन्याय होत आहे.

वेलिंगकर यांच्या मराठी राजभाषा करण्याच्या प्रयत्नांना लोकांनी साथ द्यायला पाहिजे, असे मत यापूर्वी, गो.रा. ढवळीकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा ही संतांची भाषा असून ती एक समृद्ध भाषा असल्याचे ते म्हणाले. पूर्वी सर्वच ठिकाणी मराठीतूनच व्यवहार व्यायचा. कोंकणी जरी काही लोकांमुळे राजभाषा झाली तरीही ती कुठेही व्यवहारात वावरली जात नाही. आम्ही कोंकणी भाषेला बोली भाषाच मानतो, असे ढवळीकर म्हणाले.

तरच सरकारवर येईल दबाव

काही पोर्तुगीजधार्जिणे लोक अजूनही गोवा हा वेगळा प्रदेश म्हणतात. तो एक स्वतंत्र देशच म्हणून ओळखला जावा म्हणून काहींनी तर युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेला निवेदन, पत्रही लिहिले आहे. हेच लोक मराठी संस्कृतीला मारक ठरत आहेत. मराठी मतपेढी बळकट केल्यास सरकारवर मराठी राजभाषा करण्यास दबाव येईल.

युवकांचे मेळावे घेणार

वेलिंगकर यांनी, मडगाव प्रखंडातील मराठीप्रेमींना, जो पक्ष आणि उमेदवार मराठीला पाठिंबा देईल त्यालाच मतदान करायला आणि त्याच्याकडून मराठी राजभाषा करण्यास वचनबद्ध राहण्याची अट घालण्यास सांगितले. यापुढे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात युवकांची संमेलने होतील आणि मराठी ऐक्य साधले जाईल.

'रोमी ही भारतीय लिपीच नाही'

या कार्यक्रमात नंतर, मराठीप्रेमींनी मराठी राजभाषा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. यानंतर, पत्रकारांशी बोलताना वेलिंगकर म्हणाले की, सासष्टी तसेच दक्षिण गोव्यातील काही भागात कोंकणी रोमी लिपीला राजभाषा म्हणून स्थान मिळावे अशी चळवळ सुरू आहे. मुळात रोमी ही भारतीय लिपिच नाही आणि त्यामुळे त्या लोकांची ही मागणी चुकीची आहे. आम्ही रोमि लिपीला कदापि राजभाषा दर्जा देण्यास मान्य होणार नाही. मराठी भाषेमुळेच गोव्यात भारतीय संस्कृती टिकून आहे. त्यामुळे मराठी ही राजभाषा झालीच पाहिजे, असे वेलिंगकर म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाmarathiमराठीPoliticsराजकारण