शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

चर्चिल, रवी, नार्वेकरांचा काळ संपला

By admin | Updated: May 19, 2014 01:31 IST

पणजी : चर्चिल आलेमाव, रवी नाईक, दयानंद नार्वेकर अशा एकेकाळच्या हेविवेट राजकारण्यांचा काळ आता संपला आहे, ही गोष्ट यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केली.

पणजी : चर्चिल आलेमाव, रवी नाईक, दयानंद नार्वेकर अशा एकेकाळच्या हेविवेट राजकारण्यांचा काळ आता संपला आहे, ही गोष्ट यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केली. या तिन्ही नेत्यांना अतिशय कमी मते मिळाली असून, पराभवाने सातत्याने त्यांची पाठ धरली आहे. त्यावरून राजकारणातील या तीन नेत्यांचे दिवस आता राहिलेले नाहीत हे निकालाने दाखवून दिले. चर्चिल आलेमाव यांचा विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघात पराभव झाल्यानंतर नावेली मतदारसंघानेही त्यांना पूर्णपणे बाजूला केले. नावेली, बाणावली व काही प्रमाणात सावर्डे मतदारसंघातच चर्चिल यांचा प्रभाव आहे, असे मानले जात होते. ते ख्रिस्ती धर्मीय मतदारांची बर्‍यापैकी मते मिळवतील, असेही वाटत होते; पण प्रचंड पैसा खर्च करूनदेखील आलेमाव यांना मतदारांची साथ लाभली नाही. यावेळच्या लोकसभा निवडणुकीने आलेमाव यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले आहे. आलेमाव यांच्यापेक्षा आम आदमी पक्षाच्या स्वाती केरकर या नवख्या उमेदवार दक्षिणेतील लोकांना सरस वाटल्या. चर्चिल व रवी नाईक हे एकेकाळी मास लिडर मानले जात होते. चर्चिल यांनी युगोडेपाच्या तिकिटावर एकेकाळी काँग्रेसचे एदुआर्द फालेरो यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. आलेमाव यांची प्रतिमा अलीकडील काळात खूपच डागाळली. आलेमाव यांच्याप्रमाणेच रवी नाईक यांचीही कारकीर्द संपुष्टात आल्यासारखी स्थिती आहे. रवींचा फोंडा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर फोंडा पालिका निवडणुकीत रवींचा पुत्र रॉय नाईक हाही निवडून आला नाही. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत रवी नाईक यांना एवढी कमी मते मिळतील असे काँग्रेसमध्ये कुणाला वाटले नव्हते. काही काँग्रेस समर्र्थकांनीही रवी नाईक यांना मते दिली नाहीत. गृहमंत्री बनल्यानंतर ड्रग्सच्या विषयावरून विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांत नाईक यांच्या प्रतिमेस जे तडे गेले, त्यातून पुन्हा त्यांची प्रतिमा सावरली नाही. आताचा युवा मतदार हा उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेसह सर्वच गोष्टींचा विचार करतो. अ‍ॅड. दयानंद नार्वेकर यांना प्रथम हळदोणे मतदारसंघात ग्लेन तिकलो यांनी सहज हरविले. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नार्वेकरांचे राजकीय वजन आणखी कमी झाले. त्यांना या वेळी लोकसभा निवडणुकीत केवळ चार हजार मते मिळाली. हळदोणेतही नगण्य मते मिळाली. यावरून त्यांचाही राजकीय काळ संपल्याचे स्पष्ट झाले. (खास प्रतिनिधी)