शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले: राज्यपाल, राज्याच्या प्रगतीचा आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2024 09:51 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले आहे. तर गोमंतकीयांचे दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी गोव्यात ३३,००० हून अधिक कारागिरांनी नोंदणी केली आहे, असे राज्यपालांनी विधानसभेत अभिभाषणात स्पष्ट केले. मात्र धगधगता म्हादई विषय किंवा खाण व्यवसाय निश्चितपणे कधी सुरू होणार, याबाबत कोणतेही भाष्य न केल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल, शुक्रवारी पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला. राज्यपाल म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेने प्रचंड प्रगती दाखवली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने १२ नव्या उद्योगांना मंजुरी दिली. ९ उद्योगांच्या विस्तारकामासाठी परवानगी दिली. यातून ६८९ कोटी रुपये गुंतवणूक येणार असून ५,५६८ जणांना नोकऱ्या मिळतील. पोलिस कॉन्स्टेबलच्या ३० टक्के रिक्त जागा भरण्यात येत आहेत. १६१ होमगार्डना कॉन्स्टेबल म्हणून सेवेत घेतले आहे. राज्यपाल म्हणाले की, मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेखाली सरकारी कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये ८,८५२ युवकांची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली.

खाणी कधी सुरू होणार काही स्पष्ट केले नाही, परंतु खनिज थाहतूक करणाऱ्या टिप्पर ट्रकवाल्यांना ग्रीन टॅक्स तसेच इतर करांच्या बाबतीत सवलत देण्यात येत आहे. १९८ अर्ज त्यासाठी मंजूर झाले आहेत, असे अभिभाषणात स्पष्ट करण्यात आले. अटल आसरा योजनेचा ४५९ एसटी बांधवांनी लाभ घेतलेला आहे.

दयानंद योजनेचे १.३८,१२४ लाभार्थी असून मानधनावर १८५.१९ कोटी रुपये खर्च करण्यात आला. गृह आधारच्या १ लाख ३४ हजार ३५१ लाभार्थी असून वर्षभरात १६१ कोटी म्हणून अधिक रुपये मानधनावर खर्च केले.

चार कोटींचे ड्रग्स जप्त

राज्यातील गुन्हे नियंत्रणात असल्याचा दावा करीत राज्यपाल म्हणाले की, २०२३ मध्ये ३.९६ कोटीचे ड्रग्स जप्त केले. गेल्या वर्षी घडलेल्या गुन्ह्यांपैकी ८५.८३ टक्के प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५,१९,४४३ गुन्हे नोंदवून ३४ कोटी रुपये दंड वसूल केला. 

टॅग्स :goaगोवा