शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

जनतेच्या पैशावर डल्ला का मारता?

By admin | Updated: June 30, 2014 02:11 IST

लोकांतून विचारणा : खाण अवलंबितांची जबाबदारी खाणमालकांची

पणजी : खाण अवलंबितांना काही प्रमाणात कर्जमाफीसाठी सरकारी तिजोरीतून जनेतेचा पैसा उपलब्ध करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त होत आहे. खाणमालकांची जबाबदारी सरकार आपल्या खांद्यावर का घेत आहे, अशी विचारणा लोक करत आहेत. या विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच वित्तीय संस्थांची बैठक घेतली. तीत अवलंबितांसाठी एकरकमी कर्जफेड योजना दिल्यास सरकारी तिजोरीतून मदत देण्याची तयारी दाखवली आहे. याविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या संदर्भात खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गावस म्हणाले की, हा तर जनतेशी द्रोहच आहे. सरकारची तिजोरी खाणमालकांनी आधीच रिकामी केली आहे. ट्रकवाले, बार्जमालक यांना खाणमालकांनी देशोधडीला लावले आहे. या सर्वांच्या कर्जमुक्तीची जबाबदारी सरकारची नव्हे तर खाणमालकांची होती; कारण खनिज व्यवसायातून खाणमालकांनी बक्कळ पैसा कमावला आहे. त्यांनी बेकायदेशीर गोष्टी केलेल्या असतानाही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. खाणमालकांवर कारवाईही केली जात नाही किंवा त्यांच्याकडून लूट वसूलही केली जात नाही. उलट अवलंबितांसाठी सरकारी तिजोरी रिकामी करायला हे सरकार निघाले आहे. पर्रीकर हे खाणमालकांचे हस्तक बनले आहेत. अर्थतज्ज्ञ तथा समाजकार्यकर्ते राजेंद्र काकोडकर म्हणाले की, बार्जवाले किंवा ट्रकमालक यांची मालमत्ता तपासल्याशिवाय सरकारी तिजोरीतून त्यांच्या कर्जमाफीसाठी निधी देणे योग्य ठरणार नाही. एक कोटीचे कर्ज असलेल्या बार्जमालकाचे ५0 कोटींचे हॉटेल असू शकते मग अशा बार्जमालकालाही कर्जमाफी मिळणार काय. वित्त खात्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार चालू आर्थिक वर्षातच १३२ कोटी, २0१५-१६ या वर्षात १६५ कोटी, २0१६-१७ या वर्षात १४८ कोटी, तर २0१७-१८ मध्ये तब्बल ४00 कोटी रुपये सरकारला देय असलेल्या रोख्यांपोटी बाहेर काढावे लागतील. खाणबंदीमुळे आधीच आर्थिक कारभार डबघाईस आलेला आहे. असे असताना देय असलेल्या रोख्यांचे पैसे बाहेर काढण्याचे हे नवे आव्हान सरकारसमोर आहे. आगामी दहा वर्षांच्या काळात रोख्यांच्या देय असलेल्या रकमेवर सुमारे ३७५६ कोटी रुपये तिजोरीतून बाहेर काढावे लागणार आहेत. सरकारने गरजेच्यावेळी रोख्यांच्या स्वरूपात खुल्या बाजारातून वेळोवेळी कर्ज उचलताना ११.५0 टक्के ते १३.0५ टक्क्यांपर्यंत व्याजाने ते घेतलेले आहे. १0 ते १५ वर्षांच्या मुदतीसाठी काढलेले अनेक रोखे आता देय ठरले आहेत. (प्रतिनिधी)