शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

भाजीपाला खरेदीसाठी पुन्हा लोकांची झुंबड; कर्फ्यू वाढल्यानं एकच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 22:21 IST

भाजी पुरवठाही कमी असल्यानं नागरिकांचा गोंधळ

मडगाव: कुठलीही पूर्वकल्पना न देता गोव्यातील कर्फ्यू तीन दिवसांनी वाढविल्याचा विपरीत परिणाम सोमवारी दिसून आला. लोकांनी सामाजिक अंतर पाळावे या हेतूने जरी हा कर्फ्यू वाढविण्यात असला तरी अत्यावश्यक वस्तूच मिळणार नाहीत या भीतीने लोकांनी दुकानावर गर्दी केल्याचे दिसून आले. विशेषत: भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उडाली होती. त्यातच सोमवारी बेळगावातून भाजी घेऊन येणारी वाहनेच न आल्याने भाज्यांचा तुटवडाही जाणवला.सोमवारी सकाळी लोकांनी भाज्यांच्या दुकानांवर गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी लगेच येऊन ही दुकाने बंद केल्याने लोकांची निराशा झाली. या गर्दीचा फायदा उठवत काही दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा दरात भाजी विकली. मडगावातील गांधी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांना विचारले असता, रोज गांधी मार्केटात बेळगावहून तीन ट्रक भाजी येते पण सोमवारी एकही ट्रक आला नाही असे त्यांनी सांगितले.या कर्फ्यूतून अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आल्याचे सांगूनही सोमवारी पोलिसांनी किराणा मालाची दुकानेही जबरदस्तीने बंद करायला लावली. लोटली येथे सकाळी किराणा माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना हात हलवित परत यावे लागले. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आपचे रामीरो मास्कारेन्हस यांनी कर्फ्यू म्हणजे लोकांना उपाशी मारण्याचे साधन नव्हे अशी टीका केली. किराणा मालाची दुकाने काही काळासाठी जरी उघडली तरी ती पोलिसांकडून बंद केली गेल्याची माहिती त्यांनी दिली.फक्त किराणा मालाचीच नव्हे तर वृत्तपत्ने विकणारी दुकानेही काही ठिकाणी पोलिसांनी बंद केली. दुसऱ्या बाजूने वृत्तपत्र विक्रेत्या मुलांनीही पेपर न टाकल्याने कित्येकांना वृत्तपत्रेही वाचता आली नाहीत. केवळ औषधालयेच कुठल्याही निर्बंधाशिवाय खुली होती. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळेही अत्यावश्यक ठिकाणी कामावर जाणा:या लोकांची अडचण झाली. काही जणांनी आपली खाजगी वाहने घेऊन कामावर येणे पसंत केले.ही गोंधळाची स्थिती हाताळण्यासाठी अशा कर्फ्यूत लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने काय करावे आणि काय करू नये याची नेमकी माहिती सरकारने लोकांना द्यावी अशी आपचे सिद्धार्थ कारापूरकर यांनी केली आहे.

पाववाल्यांना कामाची मोकळीक द्यागोवा सरकारने लागू केलेल्या तीन दिवसांच्या कर्फ्यूत गोव्यातील बेकरीवाले आणि पाववाले सामील होण्यास तयार आहेत. पण या व्यावसायिकांना आपली भट्टी सुरू करण्यासाठी थोडा वेळ या कर्फ्यूतून मोकळीक द्या अशी मागणी गोवा बेकर्स संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडीस यांनी केली आहे. भट्टी दोन तीन दिवस बंद ठेवली तर ती परत सुरू करण्यासाठी बराच वेळ जातो आणि त्यासाठी लाकडेही जास्त लागतात. गोव्यात पाव ही गरजेची गोष्ट असल्याने निदान थोडे तरी पाव भाजण्यासाठी त्यांना मोकळीक द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा