शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

भाजीपाला खरेदीसाठी पुन्हा लोकांची झुंबड; कर्फ्यू वाढल्यानं एकच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 22:21 IST

भाजी पुरवठाही कमी असल्यानं नागरिकांचा गोंधळ

मडगाव: कुठलीही पूर्वकल्पना न देता गोव्यातील कर्फ्यू तीन दिवसांनी वाढविल्याचा विपरीत परिणाम सोमवारी दिसून आला. लोकांनी सामाजिक अंतर पाळावे या हेतूने जरी हा कर्फ्यू वाढविण्यात असला तरी अत्यावश्यक वस्तूच मिळणार नाहीत या भीतीने लोकांनी दुकानावर गर्दी केल्याचे दिसून आले. विशेषत: भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उडाली होती. त्यातच सोमवारी बेळगावातून भाजी घेऊन येणारी वाहनेच न आल्याने भाज्यांचा तुटवडाही जाणवला.सोमवारी सकाळी लोकांनी भाज्यांच्या दुकानांवर गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी लगेच येऊन ही दुकाने बंद केल्याने लोकांची निराशा झाली. या गर्दीचा फायदा उठवत काही दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा दरात भाजी विकली. मडगावातील गांधी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांना विचारले असता, रोज गांधी मार्केटात बेळगावहून तीन ट्रक भाजी येते पण सोमवारी एकही ट्रक आला नाही असे त्यांनी सांगितले.या कर्फ्यूतून अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आल्याचे सांगूनही सोमवारी पोलिसांनी किराणा मालाची दुकानेही जबरदस्तीने बंद करायला लावली. लोटली येथे सकाळी किराणा माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना हात हलवित परत यावे लागले. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आपचे रामीरो मास्कारेन्हस यांनी कर्फ्यू म्हणजे लोकांना उपाशी मारण्याचे साधन नव्हे अशी टीका केली. किराणा मालाची दुकाने काही काळासाठी जरी उघडली तरी ती पोलिसांकडून बंद केली गेल्याची माहिती त्यांनी दिली.फक्त किराणा मालाचीच नव्हे तर वृत्तपत्ने विकणारी दुकानेही काही ठिकाणी पोलिसांनी बंद केली. दुसऱ्या बाजूने वृत्तपत्र विक्रेत्या मुलांनीही पेपर न टाकल्याने कित्येकांना वृत्तपत्रेही वाचता आली नाहीत. केवळ औषधालयेच कुठल्याही निर्बंधाशिवाय खुली होती. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळेही अत्यावश्यक ठिकाणी कामावर जाणा:या लोकांची अडचण झाली. काही जणांनी आपली खाजगी वाहने घेऊन कामावर येणे पसंत केले.ही गोंधळाची स्थिती हाताळण्यासाठी अशा कर्फ्यूत लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने काय करावे आणि काय करू नये याची नेमकी माहिती सरकारने लोकांना द्यावी अशी आपचे सिद्धार्थ कारापूरकर यांनी केली आहे.

पाववाल्यांना कामाची मोकळीक द्यागोवा सरकारने लागू केलेल्या तीन दिवसांच्या कर्फ्यूत गोव्यातील बेकरीवाले आणि पाववाले सामील होण्यास तयार आहेत. पण या व्यावसायिकांना आपली भट्टी सुरू करण्यासाठी थोडा वेळ या कर्फ्यूतून मोकळीक द्या अशी मागणी गोवा बेकर्स संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडीस यांनी केली आहे. भट्टी दोन तीन दिवस बंद ठेवली तर ती परत सुरू करण्यासाठी बराच वेळ जातो आणि त्यासाठी लाकडेही जास्त लागतात. गोव्यात पाव ही गरजेची गोष्ट असल्याने निदान थोडे तरी पाव भाजण्यासाठी त्यांना मोकळीक द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा