शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

भाजीपाला खरेदीसाठी पुन्हा लोकांची झुंबड; कर्फ्यू वाढल्यानं एकच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 22:21 IST

भाजी पुरवठाही कमी असल्यानं नागरिकांचा गोंधळ

मडगाव: कुठलीही पूर्वकल्पना न देता गोव्यातील कर्फ्यू तीन दिवसांनी वाढविल्याचा विपरीत परिणाम सोमवारी दिसून आला. लोकांनी सामाजिक अंतर पाळावे या हेतूने जरी हा कर्फ्यू वाढविण्यात असला तरी अत्यावश्यक वस्तूच मिळणार नाहीत या भीतीने लोकांनी दुकानावर गर्दी केल्याचे दिसून आले. विशेषत: भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उडाली होती. त्यातच सोमवारी बेळगावातून भाजी घेऊन येणारी वाहनेच न आल्याने भाज्यांचा तुटवडाही जाणवला.सोमवारी सकाळी लोकांनी भाज्यांच्या दुकानांवर गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी काही ठिकाणी लगेच येऊन ही दुकाने बंद केल्याने लोकांची निराशा झाली. या गर्दीचा फायदा उठवत काही दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा दरात भाजी विकली. मडगावातील गांधी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांना विचारले असता, रोज गांधी मार्केटात बेळगावहून तीन ट्रक भाजी येते पण सोमवारी एकही ट्रक आला नाही असे त्यांनी सांगितले.या कर्फ्यूतून अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आल्याचे सांगूनही सोमवारी पोलिसांनी किराणा मालाची दुकानेही जबरदस्तीने बंद करायला लावली. लोटली येथे सकाळी किराणा माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना हात हलवित परत यावे लागले. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आपचे रामीरो मास्कारेन्हस यांनी कर्फ्यू म्हणजे लोकांना उपाशी मारण्याचे साधन नव्हे अशी टीका केली. किराणा मालाची दुकाने काही काळासाठी जरी उघडली तरी ती पोलिसांकडून बंद केली गेल्याची माहिती त्यांनी दिली.फक्त किराणा मालाचीच नव्हे तर वृत्तपत्ने विकणारी दुकानेही काही ठिकाणी पोलिसांनी बंद केली. दुसऱ्या बाजूने वृत्तपत्र विक्रेत्या मुलांनीही पेपर न टाकल्याने कित्येकांना वृत्तपत्रेही वाचता आली नाहीत. केवळ औषधालयेच कुठल्याही निर्बंधाशिवाय खुली होती. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळेही अत्यावश्यक ठिकाणी कामावर जाणा:या लोकांची अडचण झाली. काही जणांनी आपली खाजगी वाहने घेऊन कामावर येणे पसंत केले.ही गोंधळाची स्थिती हाताळण्यासाठी अशा कर्फ्यूत लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने काय करावे आणि काय करू नये याची नेमकी माहिती सरकारने लोकांना द्यावी अशी आपचे सिद्धार्थ कारापूरकर यांनी केली आहे.

पाववाल्यांना कामाची मोकळीक द्यागोवा सरकारने लागू केलेल्या तीन दिवसांच्या कर्फ्यूत गोव्यातील बेकरीवाले आणि पाववाले सामील होण्यास तयार आहेत. पण या व्यावसायिकांना आपली भट्टी सुरू करण्यासाठी थोडा वेळ या कर्फ्यूतून मोकळीक द्या अशी मागणी गोवा बेकर्स संघटनेचे अध्यक्ष पीटर फर्नांडीस यांनी केली आहे. भट्टी दोन तीन दिवस बंद ठेवली तर ती परत सुरू करण्यासाठी बराच वेळ जातो आणि त्यासाठी लाकडेही जास्त लागतात. गोव्यात पाव ही गरजेची गोष्ट असल्याने निदान थोडे तरी पाव भाजण्यासाठी त्यांना मोकळीक द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा