शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

...तर होणार अधिकाऱ्यांना दंड

By admin | Updated: May 20, 2017 02:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : कालबद्ध सेवा हमी कायद्यानुसार लोकांना विविध प्रकारच्या सेवा प्रशासनाने ठरलेल्या दिवसांत द्यायलाच हव्यात, असा

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : कालबद्ध सेवा हमी कायद्यानुसार लोकांना विविध प्रकारच्या सेवा प्रशासनाने ठरलेल्या दिवसांत द्यायलाच हव्यात, असा आग्रह सरकारने धरला आहे. म्युटेशनसह अनेक प्रकारच्या सेवा आॅनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने सरकारने मार्गी लावल्या. आता यापुढेही जर सरकारी अधिकारी लोकांचे अर्ज प्रलंबित ठेवू लागले तर, येत्या जूनपासून अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच महसूल तथा आयटी मंत्री रोहन खंवटे यांच्यात चर्चा होऊन तसे ठरले आहे.अधिकाऱ्यांना सरकारने आतापर्यंत पुरेसा वेळ दिला आहे. उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करून विविध कार्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध करण्यात आले आहे. विद्यमान सरकार अधिकारावर आल्यानंतर कालबद्ध सेवा हमी कायदा जोरदारपणे मार्गी लावण्याचा संकल्प सोडला गेला. अलीकडे या कायद्याखाली काही सेवा मार्गीही लावण्यात आल्या. काही सरकारी कर्मचारी व अधिकारी लोकांच्या अर्जांबाबत वेळकाढू धोरण स्वीकारतात. ते जलदगतीने अर्ज निकालात काढत नाहीत. त्यामुळे लोकांच्या तक्रारी येतात. वीज, नगर नियोजन, पंचायत, वाहतूक, बांधकाम, आरोग्य आदी खात्यांबाबत गेली अनेक वर्षे लोकांच्या अर्जांबाबत टोलवा- टोलवीच करत राहण्याचे प्रकार चालत आले आहेत. आता महसूल खात्याशी निगडित बहुतांश सेवा आॅनलाईन झाल्यामुळे लोकांना निवासी दाखला, जातीचा दाखला, मार्टिझ, डोमिसाईल, अन्य दाखले व प्रमाणपत्रे वेळेत मिळायलाच हवीत, असे अपेक्षित आहे. शिवाय म्युटेशनची प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण होणेही बंधनकारक ठरले आहे. अधिकाऱ्यांना जबाबदार धरून आतापर्यंत दंडात्मक कारवाई केली गेलेली नाही. मात्र, येत्या जूनपासून ही पद्धत सुरू करावी, असे शासकीय पातळीवर ठरले आहे. मंत्री रोहन खंवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला व आपली मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोलणी झाली असल्याचे सांगितले. दरम्यान, पार्सेकर सरकार अधिकारावर असताना जे माहिती तंत्रज्ञान धोरण तयार करण्यात आले होते, त्या धोरणाचा विद्यमान सरकारने फेरआढावा घेतला आहे. काळानुसार या धोरणात काही बदल करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या १५ दिवसांत सुधारित धोरण जाहीर केले जाणार आहे.