शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

लोलयेतील ‘पारव्यादोण’ गोव्यातील मोठी गुहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 21:38 IST

गोव्यात अनेक ठिकाणी पाषाणी गुहा आहेत; परंतु लोलये-काणकोण येथील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेली ‘पारव्यादोण’ ही गुहा गोव्यातील सर्वात लांब गुहा आहे.

वासुदेव पागी

पणजी, दि. 20 : गोव्यात अनेक ठिकाणी पाषाणी गुहा आहेत; परंतु लोलये-काणकोण येथील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेली ‘पारव्यादोण’ ही गुहा गोव्यातील सर्वात लांब गुहा आहे. ९० मीटर लांब असलेल्या या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ पायवाटेने आणि तेही मोठी कसरत करून जावे लागत असल्यामुळे ती प्रसिद्धीझोतात राहिली नाही. राज्याच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या या गावाला लांब किनारपट्टी लाभली आहे.

दगडाळ किनाऱ्याच्या या भागात ज्या ज्या ठिकाणी मोक्याच्या जागा आहेत त्या ठिकाणांना वेगवेगळे दर्या म्हटले जाते. अशाच एका दर्याला कूप या नावाने ओळखले जाते. याच कूप किनाऱ्यालगत आहे ही ९० मीटर लांबीची पाषाणी गुहा. या गुहेत जाल तर गुहेच्या दारात पाय ठेवताच वटवाघळांचे थवे एकाच वेळी विचित्र आवाज करीत वेगाने पळताना दिसतील. काही वटवाघळे उलटी टांगलेली दिसतील. दृष्टी कमजोर असलेल्या या वटवाघळांना ध्वनिलहरींच्या आधारावर तेथून दूर जायला बराच वेळ लागतो. त्यामुळे गुहेत शिरण्यासाठी बराच वेळ दारातच थांबावे लागते. एका बाजूने आत गेले तर ९० मीटरवर दुसऱ्या बाजूने त्याला छोटेसे खिंडार आहे; परंतु त्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न सहसा कोणी करीत नाहीत. ही गुहा जरी असली तरी त्यात २४ तास समुद्राचे पाणी असते. गुहेच्या मागच्या बाजूने ते गुहेत शिरते. ढोपर बुडेल इतके पाणी गुहेत मध्यभागी असते. त्या पुढे ते आणखी खोल आहे. जगातील बहुतेक गुहा कशा निर्माण झाल्या याबद्दल कारणे सांगितली जातात.

काही गुहा या मानवनिर्मित असतात तर काही नैसर्गिक. पारव्यादोण गुहा ही समुद्राच्या लाटांच्या प्रहारांमुळे निर्माण झाल्याचा तर्क भूगोलाचे अभ्यासक प्रो. एफ.एम. नदाफ करतात. समुद्राच्या लाटांत प्रचंड शक्ती असते. लाटांच्या सततच्या आघातात दगडांची झीज होते. तेथील पाषाणी आणि इतर दगडांना चिरा गेलेल्या दिसतात त्या याच प्रक्रियेमुळे, असे प्रो. नदाफ सांगतात. पारव्यादोण गुहा ही राज्यातील सर्वांत लांब गुहा असली तरी या ठिकाणी चुकून कोणी पर्यटक येतात. देशीही नाही आणि विदेशीही नाही. राज्याच्या पर्यटन नकाशावर या गुहेचा उल्लेख नाही. तसेच या ठिकाणी पोहोचण्यासाठी थेट रस्ते नाहीत.

दीड दोन किलोमीटरवर वाहन ठेवून पायवाटने जावे लागते. पायवाटही कसरतीची असून बूट घालून चालणे या ठिकाणी जोखमीचे आहे. या किनाऱ्यावर दिसत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, काही जुने कपडे, मीठ घालून ठेवलेल्या कागदाच्या पुड्या, त्या ठिकाणी थाटलेल्या दगडी चुली या पाहून या ठिकाणी पर्यटकांची ये-जा होत असल्याचा समज होण्याचीही शक्यता आहे. या ठिकाणी येणे-जाणे होते हे खरे; परंतु ते पर्यटकांचे नसून लोलये ग्रामस्थांचे. येथील लोक या किनाऱ्यांवर वस्ती करतात. संध्याकाळी येऊन एक रात्र त्या ठिकाणी घालवितात. मासेमारी वगैरे करून जेवण तेथेच बनवितात आणि झोपतात.

सकाळी उठून घरी येतात. ही लोलये गावची अनोखी परंपराच आहे. वस्तीला जाऊया का, असे या गावातील कोणी म्हटले तर ते दुसरीकडे तिसरीकडे कोठेच नसून दर्यावर जाऊन वस्ती करणे असेच ते अभिप्रेत असते. असे किमान १६ वस्तीचे दर्या या ठिकाणी आहेत. पाहुण्यांना या ठिकाणी सवय नसल्यामुळे एक एक पाऊल टाकताना जपून जावे लागत असले तरी लोलयेवासीय या ठिकाणी रात्रीच्या अंधारातही बिनदिक्कत वावरतात. एका हातात मासे पकडण्याचा गळ, खांद्याला नायलॉनच्या जाळीसारखी पिशवी घेऊन इथल्या कडेकपारीतून सहज फिरत असतात.