शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांना दिल्लीचे साकडे!

By admin | Updated: November 5, 2014 02:20 IST

मुख्यमंत्री आज दिल्लीत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उमटवली मोहोर!

नवी दिल्ली/पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीत बोलविण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून बुधवारी नवी दिल्लीला निघत आहेत. याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बुधवारी दुपारी नवी दिल्लीला रवाना होणार हे खरे आहे, असे सांगितले. केंद्रात मोठी जबाबदारी देण्यासंबंधी चर्चेसाठी ही बैठक आहे का, असे विचारले असता त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचे ते म्हणाले; परंतु आपली मात्र काही महत्त्वाची कामे तिथे असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळात पर्रीकर यांचे ज्ञान आणि अनुभव उपयोगात आणण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. सध्या बऱ्याच मंत्र्यांकडे दोन किंवा तीन खाती आहेत. पर्रीकर यांनी ३० आॅक्टोबर रोजी मोदींची भेट घेतली, त्या वेळी त्यांच्या सहभागाचे संकेत मिळाले. अरुण जेटली सध्या अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीत व्यग्र आहेत. त्यांच्याकडील संरक्षण खाते पर्रीकर यांना दिले जाईल. पर्रीकर हे दिल्लीहूनच गोव्याच्या कारभाराकडे लक्ष ठेवणार असून नव्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करतील. पर्रीकर यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. मोदी १२ नोव्हेंबर रोजी म्यान्मार, आॅस्ट्रेलिया आणि फिजीच्या अधिकृत भेटीवर जात आहेत, तत्पूर्वीच हा अंक पार पडेल. नागपूरहून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट करून त्यात राज्यांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करावा, यासाठी संघाने एक राजकीय नीती तयार केली आहे. या योजनेनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह राजस्थानच्या मुख्यमंत्री विजयाराजे शिंदे यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणे घाटत आहे. दिल्लीतील एकूणच मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच केली जाणार असून संरक्षण मंत्रालयांसह बरेच मोठे बदल त्यात अभिप्रेत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजपर्यंत दिल्लीचे आपल्याला आमंत्रण आल्याचा इन्कार केला असला, तरी संरक्षण मंत्रालयाची स्वतंत्र जबाबदारी मिळत असेल तर त्यांनी ती स्वीकारावी, असा मतप्रवाह गोव्यातही निर्माण झाला आहे. संरक्षणमंत्रिपद हे सर्वोच्च पद तर आहेच, शिवाय पंतप्रधानांसह अन्य तिघांच्या बनलेल्या सर्वोच्च मंत्रिमंडळाचेही ते सदस्य राहाणार आहेत. हे मंडळ सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार बाळगते. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, पर्रीकर दिल्लीला जाण्यास तयार असतील तर त्यांना त्यांच्या राज्यात नवीन मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार देण्यासही भाजपा तयार झाला आहे. (विशेष प्रतिनिधी)