शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष स्तरावर

By admin | Updated: August 20, 2014 02:35 IST

पणजी : राज्यात ग्रामपंचायतींच्या आणि जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे,

पणजी : राज्यात ग्रामपंचायतींच्या आणि जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत मंगळवारी सादर केलेल्या एका लेखी उत्तरातून स्पष्ट होत आहे. २०१५ साली जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत काय, आणि त्या पक्षाच्या बॅनरखाली घ्याव्यात असे ठरले आहे काय, अशी विचारणा सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. गोवा पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रियेच्या १९९६ सालच्या नियमांनुसार पंचायत किंवा जिल्हा पंचायत निवडणुका घेणे हे राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून ठरवते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायत व पालिका निवडणुकाही पक्षाच्या बॅनरखाली घ्याव्यात असे ठरले आहे काय, अशीही विचारणा आमदार गावकर यांनी केली आहे. त्यावर पालिका निवडणुका पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा अजून तरी प्रस्ताव नाही, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत निवडणुका मात्र पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा धोरणात्मक निर्णय सरकार घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. (खास प्रतिनिधी)