शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पणजी : २०१७ सालची निवडणूक ही निश्चितच भाजपकडून आपल्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री

By admin | Updated: May 7, 2015 00:35 IST

यांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...

लक्ष्मीकांत पार्सेकरयांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...ॅ या पुढील म्हणजे २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला किती जागा मिळतील व त्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील?- माझ्या पक्षाने मला विश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. मी मुख्यमंत्री असल्याने २०१७ची निवडणूक भाजप माझ्याच नेतृत्वाखाली लढवील. भाजपने माझ्याच नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जावे, असा आग्रहही मी पक्षाकडे धरीन. २०१२ साली आम्हाला २१ जागा मिळाल्या. २०१७ साली मी भाजपला निश्चितच २६ ते २७ जागा मिळवून देईन. मला तेवढा विश्वास आहे. आमचे लक्ष्य ३१ जागा मिळविण्याचे असेल. मगो किंवा अन्य कोणता पक्ष त्या वेळी आमच्यासोबत असेल की नाही, यावर मी भाष्य करत नाही; पण पुढील अडीच वर्षांत आयटी प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक सिटी, गुंतवणूक मंडळासमोर येणारे प्रस्ताव अशा मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. मी अडीच वर्षांत भरीव काम करून दाखवीन. अलीकडेच आम्ही ३८ प्रकल्प मंजूर केले. त्यातून सहा हजार रोजगार संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्याही अत्यंत चांगल्या विमा व अन्य योजना येत आहेत. भाजपला २०१२ सालापेक्षाही २०१७ साली जास्त जागा मी मिळवून देईन. त्यासाठी रक्ताचे पाणी करीन.ॅ गेल्या सहा महिन्यांत तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकहितासाठी काय केले?- २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ती निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली नव्हती. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळी भाजप लढला होता. मी त्या वेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपला बहुमत मिळाले, तर पर्रीकर सीएम बनतील, असे त्या वेळी पक्षाने अगोदरच ठरविले होते. पर्रीकर यांना केंद्रात जावे लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे मुख्यमंत्रिपद आले. कोणतेही लॉबिंग न करता किंवा दिल्लीत जाऊन कुणाकडे मुख्यमंत्रिपद न मागता माझ्याकडे पक्षाने मोठ्या विश्वासाने व जबाबदारीने हे पद सोपविले. भाजपने निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातून जी आश्वासने दिली होती, त्यापैकी काही आश्वासने अडीच वर्षांच्या कालावधीत पर्रीकर सरकारने मार्गी लावली. उर्वरित ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या, त्या पुढे नेणे हे माझे काम आहे. गेल्या अर्थसंकल्पातून मी पूर्वीच्या काही योजनांमध्ये सुधारणा केल्या. काही घोषणा व योजनांना नव्या गोष्टी जोडल्या. माझ्या पक्षाने जनतेला निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने मी पूर्णत्वास नेत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही होत आहेत.पणजी : २०१७ सालची निवडणूक ही निश्चितच भाजपकडून आपल्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरयांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...ॅ या पुढील म्हणजे २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला किती जागा मिळतील व त्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील?- माझ्या पक्षाने मला विश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. मी मुख्यमंत्री असल्याने २०१७ची निवडणूक भाजप माझ्याच नेतृत्वाखाली लढवील. भाजपने माझ्याच नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जावे, असा आग्रहही मी पक्षाकडे धरीन. २०१२ साली आम्हाला २१ जागा मिळाल्या. २०१७ साली मी भाजपला निश्चितच २६ ते २७ जागा मिळवून देईन. मला तेवढा विश्वास आहे. आमचे लक्ष्य ३१ जागा मिळविण्याचे असेल. मगो किंवा अन्य कोणता पक्ष त्या वेळी आमच्यासोबत असेल की नाही, यावर मी भाष्य करत नाही; पण पुढील अडीच वर्षांत आयटी प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक सिटी, गुंतवणूक मंडळासमोर येणारे प्रस्ताव अशा मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. मी अडीच वर्षांत भरीव काम करून दाखवीन. अलीकडेच आम्ही ३८ प्रकल्प मंजूर केले. त्यातून सहा हजार रोजगार संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्याही अत्यंत चांगल्या विमा व अन्य योजना येत आहेत. भाजपला २०१२ सालापेक्षाही २०१७ साली जास्त जागा मी मिळवून देईन. त्यासाठी रक्ताचे पाणी करीन.ॅ गेल्या सहा महिन्यांत तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकहितासाठी काय केले?- २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ती निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली नव्हती. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळी भाजप लढला होता. मी त्या वेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपला बहुमत मिळाले, तर पर्रीकर सीएम बनतील, असे त्या वेळी पक्षाने अगोदरच ठरविले होते. पर्रीकर यांना केंद्रात जावे लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे मुख्यमंत्रिपद आले. कोणतेही लॉबिंग न करता किंवा दिल्लीत जाऊन कुणाकडे मुख्यमंत्रिपद न मागता माझ्याकडे पक्षाने मोठ्या विश्वासाने व जबाबदारीने हे पद सोपविले. भाजपने निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातून जी आश्वासने दिली होती, त्यापैकी काही आश्वासने अडीच वर्षांच्या कालावधीत पर्रीकर सरकारने मार्गी लावली. उर्वरित ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या, त्या पुढे नेणे हे माझे काम आहे. गेल्या अर्थसंकल्पातून मी पूर्वीच्या काही योजनांमध्ये सुधारणा केल्या. काही घोषणा व योजनांना नव्या गोष्टी जोडल्या. माझ्या पक्षाने जनतेला निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने मी पूर्णत्वास नेत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही होत आहेत.