शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

बाहेरच्या लोकांनी सत्तरी अशांत करू नये; म्हादईबाबत सर्वांमध्ये आधीपासूनच पुरेशी जागृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 15:51 IST

आरजीची पदयात्रा रोखल्याने तणाव निर्माण झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'सत्तरीबाहेरील लोकांनी येथे येऊन अशांतता माजवू नये. म्हादईच्या प्रश्नावर स्थानिक जागरूक आहेत,' असे पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी सुनावले आहे. आरजीने म्हादईच्या विषयावर सत्तरीत काढलेल्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर दिव्या राणे यांनी हे विधान केले आहे. आरजीची ही पदयात्रा रोखल्याने सोमवारी तणाव निर्माण झाला होता.

आमदार दिव्या म्हणाल्या की, 'सत्तरीत म्हादईबाबत कोणीही, कसलीही जागृती करण्याची गरज नाही. लोकांना विषय ठाऊक आहे. पदयात्रा काढण्यासाठी काल जे आले होते, ते सर्व जण सत्तरीबाहेरील होते. कोणीही स्थानिक त्यांच्याबरोबर नव्हता. गावात अशांतता नको, म्हणून स्थानिकांचा पदयात्रेला विरोध होता. 

दिव्या राणे म्हणाल्या की, कोणताही विषय असू दे. सत्तरीतील लोक विश्वजित आणि माझ्या पाठीशी आहेत. लोकांशी आमचा संबंध आजकालचा नव्हे तर गेल्या ५० वर्षांचा आहे. सत्तरीवासीय आमच्यासाठी स्वतःच्या परिवाराप्रमाणेच आहेत. ते अडचणीत असले तर आम्हाला वेदना होतात आणि आम्ही अडचणीत असलो तर त्यांना दुःख होते. एवढे आमचे घनिष्ठ संबंध आहेत. म्हादई बाबतीत त्यांनी कोणीही बाहेरून येऊन शिकवण्याची गरज नाही. 

शेळ, मेळावलीवासीयांना पश्चात्ताप होतोय

दरम्यान, आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, 'शेळ मेळावली वासीयांना आयआयटीला विरोध केल्याचा आज पश्चात्ताप होत आहे. सरकारने प्रकल्प पुन्हा मेळावलीत आणल्यास आणि संधी दिल्यास स्थानिक लोक तो आनंदाने स्वीकारतील.' आयआयटीविरोधात मेळावलीवासीयांनी जोरदार आंदोलन केल्याने हा प्रकल्प तेथून गुंडाळावा लागला होता. आंदोलकांना अटक करून खटलेही भरले होते. सरकार हा प्रकल्प देऊ केलेली जमीन अपुरी असल्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ती जमीन नाकारली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा