शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पश्चिम घाट अधिसूचना रद्द करण्यास विरोध

By admin | Updated: May 26, 2014 01:23 IST

पश्चिम घाट अधिसूचना रद्द करण्यास विरोध

पणजी : पश्चिम घाटातील बहुतांश भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागाखाली आणणारी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी गोवा सरकार केंद्रात स्थापन होणार असलेल्या मोदी सरकारकडे करणार असल्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. खाणी लॉबीचे चोचले पुरविण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. कस्तुरिरंगन अहवाल त्यामानाने मवाळ आहे. त्यामुळे त्यापेक्षा कडक शिफारशी असलेल्या डॉ. गाडगीळ अहवालाचीच अंमलबजावणी व्हायला हवी, असे मतही व्यक्त केले जात आहे. पर्यावरणप्रेमी तथा खाणविरोधी चळवळीतील कार्यकर्ते रमेश गावस म्हणाले की, ज्या सरकारचा अ‍ॅडव्होकेट जनरल खाणींच्या खटल्यात १९६0च्या एमसीआय नियम ३७ आणि ३८च्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना लिज हस्तांतरणाचे प्रकार गोव्यात पूर्वीपासून चालत आले आहेत असा दावा करतो, त्या सरकारला पश्चिम घाटाचे संवर्धन आदिवासी समाजाने पूर्वापार केलेले आहे याची जाणीव नाही काय? पश्चिम घाट आदिवासींनी काही प्रमाणात तरी सांभाळण्याचे काम केले. आता सरकारला कायद्याने तेच काम पुढे न्यायचे आहे. तेवढीही सरकारची इच्छा नसावी यासारखी संतापजनक बाब अन्य दुसरी नाही. पश्चिम घाटातील काही विभाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जाहीर झाल्यास खाणी बंद कराव्या लागतील, याची चिंता सरकारला वाटते. केंद्रात आता भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने हा विषय प्राधान्यक्रमे केंद्राकडे लावून धरणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केलेले आहे. पश्चिम घाटाबाबत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालावर अभ्यासार्थ आघाडीचे शास्त्रज्ञ के. कस्तुरिरंगन समिती नेमण्यात आली होती. गाडगीळ समितीच्या अहवालास पश्चिम घाटातील अनेक राज्यांनी विरोध केला होता. त्यानंतर आता कस्तुरिरंगन समितीने नवा अहवाल दिला. त्यातील निरीक्षणांनाही राज्य सरकारचा विरोध आहे. (प्रतिनिधी)