शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शत-प्रतिशत भाजप सरकारच हवे

By admin | Updated: March 4, 2017 01:53 IST

पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन

पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन होणे पक्षाच्या हिताचे आहे व या वेळी ते शक्यही आहे, असा विश्वास वनमंत्री तथा भाजपच्या कोअर टीमचे एक ज्येष्ठ सदस्य राजेंद्र आर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.आर्लेकर म्हणाले की, आपण स्वत: पेडणे मतदारसंघातून निश्चितच विजयी होईन. फक्त मतांची आघाडी २०१२ च्या तुलनेत कमी असेल. त्या वेळी साडेआठ हजारांची आघाडी होती. या वेळी पाच हजारांच्या आसपास ही आघाडी असेल. आपल्यासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी मगोप होता; पण भाजप-मगोप व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली आहे. ते म्हणाले की, प्रारंभी उगाच मगोपची हवा तयार झाली होती. या वेळी भाजप-मगोप युती नसली तरी, भाजपची मते फुटलेली नाहीत. मगोपला मगोपचीच मते मिळतील. युती नसल्याने मला व भाजपला जास्त जोमाने प्रचार करावा लागला. या वेळी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार नसून भाजपला बावीस ते तेवीस जागा प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी नव्या सरकारमध्ये मंत्री असेन; पण त्याविषयी आताच जास्त बोलण्याचे मला कारण दिसत नाही. शेवटी मंत्री कोणाला करावे ते त्या वेळचे मुख्यमंत्री व पक्ष ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.आर्लेकर म्हणाले की, मगोपने अनेक मतदारसंघांमध्ये या वेळी उमेदवार उभे केले. यामुळे भाजपची मते फुटली असे म्हणता येत नाही. मात्र, यापुढे भाजपचा विस्तार नियोजनपूर्वक व जोमाने करावा लागेल. परिणामवश भविष्यात सतत भाजप स्वबळावरच सत्तेत राहील. स्थिरता म्हणजे विकास हे सर्वांना ठाऊक आहे. लोकांनी स्थैर्यासाठी भाजपला मते दिलेली आहेत. महिलावर्गाने मोठ्या संख्येने या वेळी भाजपसाठी मतदान केले आहे. (खास प्रतिनिधी)