शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

शत-प्रतिशत भाजप सरकारच हवे

By admin | Updated: March 4, 2017 01:53 IST

पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन

पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन होणे पक्षाच्या हिताचे आहे व या वेळी ते शक्यही आहे, असा विश्वास वनमंत्री तथा भाजपच्या कोअर टीमचे एक ज्येष्ठ सदस्य राजेंद्र आर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.आर्लेकर म्हणाले की, आपण स्वत: पेडणे मतदारसंघातून निश्चितच विजयी होईन. फक्त मतांची आघाडी २०१२ च्या तुलनेत कमी असेल. त्या वेळी साडेआठ हजारांची आघाडी होती. या वेळी पाच हजारांच्या आसपास ही आघाडी असेल. आपल्यासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी मगोप होता; पण भाजप-मगोप व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली आहे. ते म्हणाले की, प्रारंभी उगाच मगोपची हवा तयार झाली होती. या वेळी भाजप-मगोप युती नसली तरी, भाजपची मते फुटलेली नाहीत. मगोपला मगोपचीच मते मिळतील. युती नसल्याने मला व भाजपला जास्त जोमाने प्रचार करावा लागला. या वेळी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार नसून भाजपला बावीस ते तेवीस जागा प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी नव्या सरकारमध्ये मंत्री असेन; पण त्याविषयी आताच जास्त बोलण्याचे मला कारण दिसत नाही. शेवटी मंत्री कोणाला करावे ते त्या वेळचे मुख्यमंत्री व पक्ष ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.आर्लेकर म्हणाले की, मगोपने अनेक मतदारसंघांमध्ये या वेळी उमेदवार उभे केले. यामुळे भाजपची मते फुटली असे म्हणता येत नाही. मात्र, यापुढे भाजपचा विस्तार नियोजनपूर्वक व जोमाने करावा लागेल. परिणामवश भविष्यात सतत भाजप स्वबळावरच सत्तेत राहील. स्थिरता म्हणजे विकास हे सर्वांना ठाऊक आहे. लोकांनी स्थैर्यासाठी भाजपला मते दिलेली आहेत. महिलावर्गाने मोठ्या संख्येने या वेळी भाजपसाठी मतदान केले आहे. (खास प्रतिनिधी)