शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शत-प्रतिशत भाजप सरकारच हवे

By admin | Updated: March 4, 2017 01:53 IST

पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन

पणजी : राज्यात शत-प्रतिशत भाजप सरकारच असायला हवे, अन्य पक्षांच्या कुबड्या नकोतच. मगोपविरहित भाजप सरकार स्थापन होणे पक्षाच्या हिताचे आहे व या वेळी ते शक्यही आहे, असा विश्वास वनमंत्री तथा भाजपच्या कोअर टीमचे एक ज्येष्ठ सदस्य राजेंद्र आर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.आर्लेकर म्हणाले की, आपण स्वत: पेडणे मतदारसंघातून निश्चितच विजयी होईन. फक्त मतांची आघाडी २०१२ च्या तुलनेत कमी असेल. त्या वेळी साडेआठ हजारांची आघाडी होती. या वेळी पाच हजारांच्या आसपास ही आघाडी असेल. आपल्यासाठी प्रमुख प्रतिस्पर्धी मगोप होता; पण भाजप-मगोप व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली आहे. ते म्हणाले की, प्रारंभी उगाच मगोपची हवा तयार झाली होती. या वेळी भाजप-मगोप युती नसली तरी, भाजपची मते फुटलेली नाहीत. मगोपला मगोपचीच मते मिळतील. युती नसल्याने मला व भाजपला जास्त जोमाने प्रचार करावा लागला. या वेळी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार नसून भाजपला बावीस ते तेवीस जागा प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी नव्या सरकारमध्ये मंत्री असेन; पण त्याविषयी आताच जास्त बोलण्याचे मला कारण दिसत नाही. शेवटी मंत्री कोणाला करावे ते त्या वेळचे मुख्यमंत्री व पक्ष ठरवतील, असेही त्यांनी सांगितले.आर्लेकर म्हणाले की, मगोपने अनेक मतदारसंघांमध्ये या वेळी उमेदवार उभे केले. यामुळे भाजपची मते फुटली असे म्हणता येत नाही. मात्र, यापुढे भाजपचा विस्तार नियोजनपूर्वक व जोमाने करावा लागेल. परिणामवश भविष्यात सतत भाजप स्वबळावरच सत्तेत राहील. स्थिरता म्हणजे विकास हे सर्वांना ठाऊक आहे. लोकांनी स्थैर्यासाठी भाजपला मते दिलेली आहेत. महिलावर्गाने मोठ्या संख्येने या वेळी भाजपसाठी मतदान केले आहे. (खास प्रतिनिधी)