शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ज्येष्ठता नव्हे, परफॉर्मन्स दाखवा, केजरीवालांचा गोव्यातील कार्यकर्त्यांना सल्ला

By admin | Updated: August 25, 2016 00:40 IST

केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवाअसा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकत्र्याना

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २३ : केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवा असा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिला.

विविध मतदारसंघांसाठी आपने जे समन्वयक नेमले आहेत, त्यांनाच येत्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट मिळेल असे कुणीच गृहित धरू नये, असेही केजरीवाल यांनी सांगितले. कुणीच कुणाला तिकीटाची हमी देऊ नये. मी स्वत: देखील देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला आपच्या उमेदवार निवडीच्या व्यवस्थेमधूनच जावे लागेल. आमची व्यवस्था ठरलेली असून त्या व्यवस्थेद्वारेच उमेदवार निवडले जातील. काही कार्यकर्ते इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीच्या माध्यमातून आपमध्ये आले. काही कार्यकर्ते नंतर आले.

कुणीच आपण या बॅचचा कार्यकर्ता किंवा त्या बॅचचा कार्यकर्ता असे समजू नये. अगदी कालपरवा देखील आपमध्ये जो कार्यकर्ता आलेला असेल त्या कार्यकत्र्याने जर चांगला परफॉर्मन्स दाखवला व गुणांनी तो चांगला असेल तर त्यास आपमध्ये मोठे पद मिळेल. अशावेळी आपल्यावर अन्याय झाला अशी भावना ज्येष्ठ कार्यकत्र्यानी मनात आणू नये, असे केजरीवाल यांनी बजावले.आपली चार दिवसांची गोवा भेट आटोपून केजरीवाल मंगळवारी सायंकाळी दिल्लीस परतले. जाण्यापूर्वी पणजीत त्यांनी आपच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकत्र्याची एकत्रित बैठक घेतली व त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपण गोवाभर फिरलो तेव्हा आपसाठी अनुकूल वातावरण आपल्याला अनुभवायला मिळाले. या अनुकूलतेचा लाभ उठवायचा असेल तर तुम्हाला सर्वानाच जास्त काम करावे लागेल.

जास्त वेळ द्यावा लागेल, असेही केजरीवाल यांनी सांगितल्याचे पक्ष सुत्रंनी स्पष्ट केले. आपल्या काही बैठकांसाठी गोव्यात जागा देखील अपुरी पडली, लोकांचा एवढा प्रतिसाद लाभला. आपमध्ये कुठल्याही पक्षामधून कार्यकर्ते येऊ द्या. भाजप किंवा काँग्रेसमधूनही ते येऊ द्यात, त्यांचे स्वागत करा, त्यांना आपल्यातलेच समजा. आपणच तेवढे संत व चांगले व दुसरे वाईट अशी भावना कुणीच आणू नये,असाही सल्ला केजरीवाल यांनी कार्यकत्र्याना दिला. आम्ही जाहीर केलेला एखादा उमेदवार गुणांनी योग्य नाही, असे ऐनवेळी निवडणुकीप्रसंगी जर कुणी सिद्ध केले तर आम्ही त्या उमेदवारास मागे घेऊ व त्या जागेवर पाणी सोडू, असेही केजरीवाल यांनी सांगितले.