शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठता नव्हे, परफॉर्मन्स दाखवा, केजरीवालांचा गोव्यातील कार्यकर्त्यांना सल्ला

By admin | Updated: August 25, 2016 00:40 IST

केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवाअसा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकत्र्याना

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २३ : केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवा असा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिला.

विविध मतदारसंघांसाठी आपने जे समन्वयक नेमले आहेत, त्यांनाच येत्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट मिळेल असे कुणीच गृहित धरू नये, असेही केजरीवाल यांनी सांगितले. कुणीच कुणाला तिकीटाची हमी देऊ नये. मी स्वत: देखील देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला आपच्या उमेदवार निवडीच्या व्यवस्थेमधूनच जावे लागेल. आमची व्यवस्था ठरलेली असून त्या व्यवस्थेद्वारेच उमेदवार निवडले जातील. काही कार्यकर्ते इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीच्या माध्यमातून आपमध्ये आले. काही कार्यकर्ते नंतर आले.

कुणीच आपण या बॅचचा कार्यकर्ता किंवा त्या बॅचचा कार्यकर्ता असे समजू नये. अगदी कालपरवा देखील आपमध्ये जो कार्यकर्ता आलेला असेल त्या कार्यकत्र्याने जर चांगला परफॉर्मन्स दाखवला व गुणांनी तो चांगला असेल तर त्यास आपमध्ये मोठे पद मिळेल. अशावेळी आपल्यावर अन्याय झाला अशी भावना ज्येष्ठ कार्यकत्र्यानी मनात आणू नये, असे केजरीवाल यांनी बजावले.आपली चार दिवसांची गोवा भेट आटोपून केजरीवाल मंगळवारी सायंकाळी दिल्लीस परतले. जाण्यापूर्वी पणजीत त्यांनी आपच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकत्र्याची एकत्रित बैठक घेतली व त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपण गोवाभर फिरलो तेव्हा आपसाठी अनुकूल वातावरण आपल्याला अनुभवायला मिळाले. या अनुकूलतेचा लाभ उठवायचा असेल तर तुम्हाला सर्वानाच जास्त काम करावे लागेल.

जास्त वेळ द्यावा लागेल, असेही केजरीवाल यांनी सांगितल्याचे पक्ष सुत्रंनी स्पष्ट केले. आपल्या काही बैठकांसाठी गोव्यात जागा देखील अपुरी पडली, लोकांचा एवढा प्रतिसाद लाभला. आपमध्ये कुठल्याही पक्षामधून कार्यकर्ते येऊ द्या. भाजप किंवा काँग्रेसमधूनही ते येऊ द्यात, त्यांचे स्वागत करा, त्यांना आपल्यातलेच समजा. आपणच तेवढे संत व चांगले व दुसरे वाईट अशी भावना कुणीच आणू नये,असाही सल्ला केजरीवाल यांनी कार्यकत्र्याना दिला. आम्ही जाहीर केलेला एखादा उमेदवार गुणांनी योग्य नाही, असे ऐनवेळी निवडणुकीप्रसंगी जर कुणी सिद्ध केले तर आम्ही त्या उमेदवारास मागे घेऊ व त्या जागेवर पाणी सोडू, असेही केजरीवाल यांनी सांगितले.