शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

वारस नसलेल्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2024 12:05 IST

हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वारस नसलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सरकारला अधिकार देणारा कायदा सरकारने अधिसूचीत केला आहे. यामुळे आता सरकार कायदेशीर वारस नसलेल्या व्यक्तींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सक्षम झाले आहे. हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल.

कोणतीही स्थावर संपत्ती जी सरकारच्या ताब्यात आहे ती दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सरकारच्या ताब्यात असल्याशिवाय सामान्यपणे विकली जाऊ शकत नाही, असे कायदा सांगतो. या संदर्भात नोटीस जारी केल्यानंतर सरकार दावेदारांना विवादित मालमत्तेवर दावा करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देईल. दरम्यान, बेवारस किंवा मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या जमिनी बोगस दस्तऐवज तयार करून लाटण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. 

भू-बळकाव प्रकरणात राज्य सरकारने एसआयटीही नेमली तसेच आयोगाकडून चौकशी अहवालही घेतला आहे. कायदेशीर वारस किंवा मालक नसलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे त्यासाठी कायदेशीर अधिकार देणारे गोवा एस्केट्स, जप्ती आणि बोना व्हॅकांशिया विधेयक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले होते. राज्यपालांनी संमती दिल्यानंतर ते आता अधिसूचित झाले आहे.

कोमुनिदाद जमिनीसाठी अध्यादेश 

कोमुनिदाद जमिनीचा वापर यापुढे जमीन ज्या कामासाठी मंजूर केली आहे, त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही, याबाबतचा प्रतिबंधासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. 'कलम ३१-अ', या अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आले आहे. जमीन मूळतः ज्यासाठी मंजूर करण्यात आली होती. त्याशिवाय इतर कारणांसाठी वापरण्यास प्रतिबंधित असेल. अध्यादेश ६ ऑक्टोबर रोजी राज्यपालांनी जारी केला होता आणि काल तो अधिसूचित करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार