शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वारस नसलेल्या मालमत्ता सरकारच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2024 12:05 IST

हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वारस नसलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सरकारला अधिकार देणारा कायदा सरकारने अधिसूचीत केला आहे. यामुळे आता सरकार कायदेशीर वारस नसलेल्या व्यक्तींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यास सक्षम झाले आहे. हा कायदा राज्य सरकारला अशा मालमत्तेचा प्रभार, व्यवस्थापन, प्रशासन, पर्यवेक्षण, ताबा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार देईल.

कोणतीही स्थावर संपत्ती जी सरकारच्या ताब्यात आहे ती दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सरकारच्या ताब्यात असल्याशिवाय सामान्यपणे विकली जाऊ शकत नाही, असे कायदा सांगतो. या संदर्भात नोटीस जारी केल्यानंतर सरकार दावेदारांना विवादित मालमत्तेवर दावा करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देईल. दरम्यान, बेवारस किंवा मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या जमिनी बोगस दस्तऐवज तयार करून लाटण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. 

भू-बळकाव प्रकरणात राज्य सरकारने एसआयटीही नेमली तसेच आयोगाकडून चौकशी अहवालही घेतला आहे. कायदेशीर वारस किंवा मालक नसलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे त्यासाठी कायदेशीर अधिकार देणारे गोवा एस्केट्स, जप्ती आणि बोना व्हॅकांशिया विधेयक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले होते. राज्यपालांनी संमती दिल्यानंतर ते आता अधिसूचित झाले आहे.

कोमुनिदाद जमिनीसाठी अध्यादेश 

कोमुनिदाद जमिनीचा वापर यापुढे जमीन ज्या कामासाठी मंजूर केली आहे, त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही, याबाबतचा प्रतिबंधासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. 'कलम ३१-अ', या अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आले आहे. जमीन मूळतः ज्यासाठी मंजूर करण्यात आली होती. त्याशिवाय इतर कारणांसाठी वापरण्यास प्रतिबंधित असेल. अध्यादेश ६ ऑक्टोबर रोजी राज्यपालांनी जारी केला होता आणि काल तो अधिसूचित करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार