शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

अस्तित्वात नसलेले गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील

By admin | Updated: June 2, 2014 01:47 IST

पर्यावरणप्रेमींचे मत : कस्तुरीरंगन अहवाल अवास्तव

पणजी : कस्तुरीरंगन अहवालात गोव्यात पश्चिम घाटातील जे ९९ गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठरविले आहेत, त्यातील १४ गाव अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अहवालावर किती विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अहवालातील माहिती अवास्तव असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. दुसरीकडे सरकार, उद्योजक यांचा या अहवालातील शिफारशींना विरोध आहे. केंद्राने याच अहवालाच्या आधारे अधिसूचना जारी केल्याने पश्चिम घाटात एकही खाण चालू शकणार नाही. सरकारच्या मते कोणतीही विकासकामे या भागात होऊ शकणार नाहीत. या अहवालात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील नमूद करण्यात आलेली नावे तपासली असता, सत्तरी तालुक्यातच किमान आठ आणि सांगे तालुक्यात सहा गावांची नावे अशी आढळून आली आहेत की प्रत्यक्षात हे गाव अस्तित्वातच नाहीत. सत्तरीत डोंगरवाडी, गोंयकारवाडा, भायलावाडा, हसोळे, चरवडा, रायवर, पेन्रल, गोवनोनाणे आदी गाव दर्शविण्यात आले आहेत; परंतु प्रत्यक्षात अशा नावांचे गावच अस्तित्वात नाहीत. सांगे तालुक्यात आलोट, रुंबारेम, नाकुने, डोंगर्ली, डोंगर, शिंगोणे गाव अस्तित्वात नाहीत. त्यामुळे कस्तुरीरंगन समितीला ही नावे कुठून मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळपई शहर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील दाखवण्यात आले आहे. सांगे, काणकोण व सत्तरी हे तीन तालुके पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागात मोडणारे आहेत; परंतु धारबांदोडा तालुक्यातही अशी नऊ गावे दाखवण्यात आली आहेत, जी पर्यावरणीय संवेदनशील आहेत.