शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

गोव्याची प्लॅस्टिकमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:50 IST

गोव्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची निर्मिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराविरुद्ध नगरपालिका व शासकीय यंत्रणेने एकत्रितपणे युद्धच छेडले आहे.

- सद्गुरू पाटील ।पणजी : गोव्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची निर्मिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराविरुद्ध नगरपालिका व शासकीय यंत्रणेने एकत्रितपणे युद्धच छेडले आहे. दंडात्मक कारवाईही सुरू झाली आहे. पर्यटकांचाही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याकडे कल आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सहा महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक बंदीची घोषणा केली होती. टप्प्याटप्प्याने बंदी राबविली जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले होते. त्याच धर्तीवर नगरपालिकांनी आता पणजी, मडगाव आणि म्हापसामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. या तीन शहरांतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचºयाची निर्र्मिती होते. सायंकाळी प्लॅस्टिकचा कचरा जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण व पर्यावरणाचीही मोठी हानी होते. राजधानी पणजीत तर प्लॅस्टिकचा कचरा जाळण्याविरुद्ध महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. दुकानदार, मोठे व्यापारी, विक्रेते यांनीही ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या द्यायच्या नाहीत, अशी भूमिका घेतली आहे.मडगावमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया साठपेक्षा जास्त विक्रेत्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली. म्हापशात काही विक्रेत्यांना पालिकेने कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. पणजीत महापालिकेने जागृती मोहीम सुरू केली आहे. मे महिन्यापासून दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे, असे महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी सांगितले.गोव्यात कठोरपणे प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यासाठी कार्यवाही सुरू आहे.म्हापशापासून अवघ्या दहा-बारा किलोमीटरवर जगप्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. तेथे येणारे विदेशी व देशी पर्यटक म्हापशातील बाजारपेठेला भेट देतात. पणजीतील बाजारपेठेतही अनेक पर्यटक येतात. बहुतांश प्लॅस्टिक कचरा बाजारपेठेतच तयार होतो, हे सरकारच्या लक्षात आले आहे. यापुढे पाच हजार रुपयांपर्यंत दोषींना दंड ठोठावण्याचा सरकारचा विचार आहे.>प्लॅस्टिक कचºयाविरुद्ध सुरू झालेली मोहीम स्वागतार्ह आहे. प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीची गरज होतीच. प्लॅस्टिकच्या कचºयाचे प्रमाण खूपच कमी होईल. पर्यावरणासाठी हे उपयुक्त ठरेल.- गुरुदास कामत,अध्यक्ष, ईको गोवाप्लॅस्टिकच्या कचºयाविरुद्ध अधिकाधिक जागृती व्हायला हवी. कॅन्सरसारख्या अनेक रोगांचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक उघड्यावर जाळण्याचा मूर्खपणा कुणी करू नये.- विश्वजीत राणे,आरोग्यमंत्री

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी