शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी

By किशोर कुबल | Updated: February 2, 2024 15:03 IST

दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले; राज्यपालांचे अभिभाषण

किशोर कुबल, पणजी: २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले तर गोमंतकीयांचे दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी गोव्यात ३३,००० हून अधिक कारागिरांनी नोंदणी केली आहे, असे राज्यपालांनी विधानसभेत अभिभाषणात स्पष्ट केले. मात्र धगधगता म्हादई विषय किंवा खाण व्यवसाय निश्चितपणे कधी सुरू होणार,याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला. राज्यपाल म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेने प्रचंड प्रगती दाखवली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने १२ नव्या उद्योगांना मंजुरी दिली तसेच ९ उद्योगांच्या विस्तारकामासाठी परवानगी दिली. यातून ६८९ कोटी रुपये गुंतवणूक येणार असून ५,५६८ जणांना नोकऱ्या मिळतील.पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या ३० टक्के रिक्त जागा भरण्यात येत आहेत. १६१ होमगार्डना कॉन्स्टेबल म्हणून सेवेत घेतले आहे.'राज्यपाल म्हणाले की, 'मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेखाली सरकारी कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये ८,८५२ युवकांची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली.

चालू वर्षातच १०० टक्के मलनि:सारण जोडण्या पूर्ण होतील

राज्यपाल म्हणाले की, 'स्मार्ट सिटी स्टेट' म्हणून राज्य विकसित केले जाईल. लोकांना २४ तास पाणी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून चालू वर्षातच १०० टक्के मलनि:सारण जोडण्या पूर्ण होतील. तसेच ४२.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही येणार आहे. साधन सुविधा विकास महामंडळाने गेल्या वर्षी १७३.२० कोटी रुपये खर्चाची १२ कामे पूर्ण केली असून १३ वेगवेगळ्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. ते येत्या वर्षभरात पूर्ण होतील. वीज क्षेत्रातही दहा पॅकेजमध्ये कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत.खाणी कधी सुरू होणार काही स्पष्ट केले नाही परंतु खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर ट्रकवाल्यांना ग्रीन टॅक्स तसेच इतर करांच्या बाबतीत सवलत देण्यात येत आहे. १९८ अर्ज त्यासाठी मंजूर झाले आहेत., असे अभिभाषणात स्पष्ट करण्यात आले. अटल आसरा योजनेचा ४५९ एसटी बांधवांनी लाभ घेतलेला आहे.'

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024goaगोवा