शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी

By किशोर कुबल | Updated: February 2, 2024 15:03 IST

दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले; राज्यपालांचे अभिभाषण

किशोर कुबल, पणजी: २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले तर गोमंतकीयांचे दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी गोव्यात ३३,००० हून अधिक कारागिरांनी नोंदणी केली आहे, असे राज्यपालांनी विधानसभेत अभिभाषणात स्पष्ट केले. मात्र धगधगता म्हादई विषय किंवा खाण व्यवसाय निश्चितपणे कधी सुरू होणार,याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला. राज्यपाल म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेने प्रचंड प्रगती दाखवली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने १२ नव्या उद्योगांना मंजुरी दिली तसेच ९ उद्योगांच्या विस्तारकामासाठी परवानगी दिली. यातून ६८९ कोटी रुपये गुंतवणूक येणार असून ५,५६८ जणांना नोकऱ्या मिळतील.पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या ३० टक्के रिक्त जागा भरण्यात येत आहेत. १६१ होमगार्डना कॉन्स्टेबल म्हणून सेवेत घेतले आहे.'राज्यपाल म्हणाले की, 'मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेखाली सरकारी कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये ८,८५२ युवकांची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली.

चालू वर्षातच १०० टक्के मलनि:सारण जोडण्या पूर्ण होतील

राज्यपाल म्हणाले की, 'स्मार्ट सिटी स्टेट' म्हणून राज्य विकसित केले जाईल. लोकांना २४ तास पाणी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून चालू वर्षातच १०० टक्के मलनि:सारण जोडण्या पूर्ण होतील. तसेच ४२.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही येणार आहे. साधन सुविधा विकास महामंडळाने गेल्या वर्षी १७३.२० कोटी रुपये खर्चाची १२ कामे पूर्ण केली असून १३ वेगवेगळ्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. ते येत्या वर्षभरात पूर्ण होतील. वीज क्षेत्रातही दहा पॅकेजमध्ये कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत.खाणी कधी सुरू होणार काही स्पष्ट केले नाही परंतु खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर ट्रकवाल्यांना ग्रीन टॅक्स तसेच इतर करांच्या बाबतीत सवलत देण्यात येत आहे. १९८ अर्ज त्यासाठी मंजूर झाले आहेत., असे अभिभाषणात स्पष्ट करण्यात आले. अटल आसरा योजनेचा ४५९ एसटी बांधवांनी लाभ घेतलेला आहे.'

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024goaगोवा