शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गोवा-महाराष्ट्राच्या सीमांवर माकडतापाचे राज्य

By admin | Updated: March 3, 2017 21:00 IST

माकडतापाचे संकट गोव्यातील केवळ सत्तरी तालुक्यापुरतेच मर्र्यादित राहिलेले नाही तर गोवा व महाराष्ट्राच्या सगळ्याच सीमा माकडतापाच्या संभाव्य संकटाने ताब्यात घेतल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि.03 - माकडतापाचे संकट गोव्यातील केवळ सत्तरी तालुक्यापुरतेच मर्र्यादित राहिलेले नाही तर गोवा व महाराष्ट्राच्या सगळ्याच सीमा माकडतापाच्या संभाव्य संकटाने ताब्यात घेतल्या आहेत. गोव्याची शासकीय यंत्रणा त्यामुळे सतर्क झाली आहेच, शिवाय सिंधुदुर्गच्याही यंत्रणेस सतर्क केले आहे. पेडण्यात प्रथमच माकडतापविरोधी (केएफडी) लसीकरण मोहीम हाती घेण्याचे सरकारने ठरविले आहे.वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी शुक्रवारी स्थितीचा आढावा घेतला. वन अधिकाऱ्यांशी तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. लसीकरण करण्याची सूचना मंत्री आर्लेकर यांनी आरोग्य संचालकांनाही केली आहे. सत्तरी तालुक्यातील काही भागही महाराष्ट्रातील सिंधुदुर्गला जवळ आहेत. सिंधुदुर्गमधील आयी या गावची सीमा ही सत्तरी तालुक्यातील पर्ये आणि डिचोली तालुक्यातील कुडचिरे गावाच्या सीमेला टेकून आहे. याचप्रमाणे पेडणे तालुक्यातील पत्रादेवीचा भाग हा सिंधुदुर्गच्या म्हणजे बांद्याच्या हद्दीवर आहे.आतापर्यंत सत्तरीतच माकडताप होता. प्रथम वाळपई मतदारसंघातून सुरू झालेला माकडताप आता पर्ये मतदारसंघातील केरीच्या पट्ट्यातही पोहचला आहे. यामुळे तिथे भीतीचे वातावरण असतानाच पेडणे मतदारसंघातील पत्रादेवी भागातील लोकही धास्तावले आहेत. मंत्री आर्लेकर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पेडण्यात माकडतापाचे रुग्ण सापडले नाहीत; पण सहा ते सात माकडे लोकांच्या घराच्या छपरावर मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. त्यामुळेच आपणही त्या भागास भेट दिली व शासकीय यंत्रणा सक्रिय केली. लोकांमध्ये चिंता आहे; कारण माकडांचा अचानक मृत्यू होत आहे. हे माकड बांद्याच्या भागातून आल्याची शक्यता आहे. आरोग्य खात्याच्या यंत्रणेस त्याविषयी सतर्क करून पेडण्यात लसीकरण लवकर सुरू करण्यास आपण सांगितले आहे. आरोग्य संचालकांशीही बोलणी झाली आहेत. केवळ लोकांनाच नव्हे तर पत्रादेवी व पेडणेतील अन्य गावांमधील वन कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यास सांगितले आहे. आर्लेकर यांनी सांगितले की, मृत माकडांचे अवयव प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले आहेत. पंधरा दिवसांत अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळेल. माकडतापाचा संशय तूर्त कायम आहे. सिंधुदुर्गमधील यंत्रणेसही आम्ही सतर्क केले आहे. यापूर्वी पत्रादेवी भागात अशा प्रकारे कधी लोकवस्तीत माकड अचानक मेलेले सापडत नव्हते.