शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

‘मंत्र्यांनी झोकून देऊन काम केले नाही’

By admin | Updated: March 22, 2015 01:18 IST

पणजी : भाजपच्या काही मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम केले नाही. ज्यांनी काम केले,

पणजी : भाजपच्या काही मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम केले नाही. ज्यांनी काम केले, त्यांच्या भागात पक्षाचे उमेदवार निवडून आले, ज्यांनी काम केले नाही त्यांच्या मतदारसंघात उमेदवार पराभूत झाले, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. भाजप व एकूणच सत्ताधारी आघाडी कुठे कमी पडली, हेही त्यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे- ॅ भाजपचे अनेक जिल्हा पंचायत मतदारसंघात उमेदवार का पडले असे तुम्हाला वाटते? - भाजपच्या मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम करायला हवे होते. काहीजणांनी तसे केले. काहीजण त्याबाबत कमी पडले. पेडणे तालुक्यात आमचे दोन उमेदवार पराभूत झाले. मी स्वत: माझ्या मतदारसंघात व एकूणच पेडणे तालुक्यात जास्त जाऊ शकलो नाही. आमचे चारही उमेदवार निश्चितच निवडून येतील, असे मी गृहीत धरले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांमधील रुसवेफुगवे मला कळाले असते तर मी पेडण्यात जाऊन योग्य उपाययोजना केली असती. मी योग्य ती काळजी घेतली असती. तेथील पक्ष संघटना त्याबाबत कमी पडली. ॅ भाजपच्या काही आमदारांनी जनसंपर्क वाढविणे व लोकांशी नम्रपणे वागणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते का? - निश्चितच तशी गरज आहे. लोकसंपर्क हा कायम ठेवावा लागतो. मलाही पेडण्यात व माझ्या मतदारसंघात लोकसंपर्क ठेवावा लागेल. समन्वयाबाबत आम्ही कुठे कमी पडू नये. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी आमचे काही मंत्री, आमदार तसेच काही कार्यकर्ते जेवढे सक्रिय व्हायला हवे होते तेवढे ते झाले नाहीत. ॅ काँग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला तरीही भाजपला घवघवीत यश का मिळाले नाही? - काँग्रेस पक्ष जर निवडणूक रिंगणात असता तर भाजपला जास्त जागा मिळाल्या असत्या. भाजप जास्त जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडून आला असता. काँग्रेसची हात निशाणी रिंगणात नव्हती. त्यामुळे आमच्याविरुद्ध सर्व विरोधकांची मते एकत्रित झाली. काँग्रेसची निशाणी असती तर काँग्रेसचा उमेदवार व अपक्ष उमेदवार अशी मतविभागणी झाली असती, जी भाजपसाठी अनुकूल ठरली असती. आमचे काही उमेदवार हे अवघ्या शंभर ते दोनशे मतांच्या फरकाने पडले. ॅ सरकारचे काही निर्णय किंवा धोरणे चुकली असे तुम्हाला वाटते काय? - सरकारची कामगिरी व जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल याचा तसा थेट परस्पराशी काही संबंध लावता येणार नाही. सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काही पूर्ण गोवा मतदान प्रक्रियेत सहभागी झाला नाही. त्यामुळे जय-पराजयास सरकारचे निर्णय किंवा धोरणे जबाबदार आहेत असे थेट म्हणता येणार नाही. सरकारचे कोणतेच निर्णय किंवा धोरणे चुकलेली नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा आमचा निर्णयही योग्य ठरला. (पान २ वर)