शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

‘मंत्र्यांनी झोकून देऊन काम केले नाही’

By admin | Updated: March 22, 2015 01:18 IST

पणजी : भाजपच्या काही मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम केले नाही. ज्यांनी काम केले,

पणजी : भाजपच्या काही मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम केले नाही. ज्यांनी काम केले, त्यांच्या भागात पक्षाचे उमेदवार निवडून आले, ज्यांनी काम केले नाही त्यांच्या मतदारसंघात उमेदवार पराभूत झाले, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. भाजप व एकूणच सत्ताधारी आघाडी कुठे कमी पडली, हेही त्यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे- ॅ भाजपचे अनेक जिल्हा पंचायत मतदारसंघात उमेदवार का पडले असे तुम्हाला वाटते? - भाजपच्या मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम करायला हवे होते. काहीजणांनी तसे केले. काहीजण त्याबाबत कमी पडले. पेडणे तालुक्यात आमचे दोन उमेदवार पराभूत झाले. मी स्वत: माझ्या मतदारसंघात व एकूणच पेडणे तालुक्यात जास्त जाऊ शकलो नाही. आमचे चारही उमेदवार निश्चितच निवडून येतील, असे मी गृहीत धरले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांमधील रुसवेफुगवे मला कळाले असते तर मी पेडण्यात जाऊन योग्य उपाययोजना केली असती. मी योग्य ती काळजी घेतली असती. तेथील पक्ष संघटना त्याबाबत कमी पडली. ॅ भाजपच्या काही आमदारांनी जनसंपर्क वाढविणे व लोकांशी नम्रपणे वागणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते का? - निश्चितच तशी गरज आहे. लोकसंपर्क हा कायम ठेवावा लागतो. मलाही पेडण्यात व माझ्या मतदारसंघात लोकसंपर्क ठेवावा लागेल. समन्वयाबाबत आम्ही कुठे कमी पडू नये. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी आमचे काही मंत्री, आमदार तसेच काही कार्यकर्ते जेवढे सक्रिय व्हायला हवे होते तेवढे ते झाले नाहीत. ॅ काँग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला तरीही भाजपला घवघवीत यश का मिळाले नाही? - काँग्रेस पक्ष जर निवडणूक रिंगणात असता तर भाजपला जास्त जागा मिळाल्या असत्या. भाजप जास्त जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडून आला असता. काँग्रेसची हात निशाणी रिंगणात नव्हती. त्यामुळे आमच्याविरुद्ध सर्व विरोधकांची मते एकत्रित झाली. काँग्रेसची निशाणी असती तर काँग्रेसचा उमेदवार व अपक्ष उमेदवार अशी मतविभागणी झाली असती, जी भाजपसाठी अनुकूल ठरली असती. आमचे काही उमेदवार हे अवघ्या शंभर ते दोनशे मतांच्या फरकाने पडले. ॅ सरकारचे काही निर्णय किंवा धोरणे चुकली असे तुम्हाला वाटते काय? - सरकारची कामगिरी व जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल याचा तसा थेट परस्पराशी काही संबंध लावता येणार नाही. सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काही पूर्ण गोवा मतदान प्रक्रियेत सहभागी झाला नाही. त्यामुळे जय-पराजयास सरकारचे निर्णय किंवा धोरणे जबाबदार आहेत असे थेट म्हणता येणार नाही. सरकारचे कोणतेच निर्णय किंवा धोरणे चुकलेली नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा आमचा निर्णयही योग्य ठरला. (पान २ वर)