शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पदभारानंतर मंत्री अ‍ॅक्शनमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 01:45 IST

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर वसाहती बांधण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मत गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित करण्यात आलेल्या गृहनिर्माण मंडळाला जास्तीत-जास्त महसूल प्राप्त करून देण्याचा व या मंडळातून जास्तीत-जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी सांगितले. मंडळाच्या कार्यक्षेत्राच्या विस्तारावर भर देताना राज्यात आल्वारा पद्धतीचे जे भूखंड आहेत ते भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न गृहनिर्माण मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून या भूखंडाचा फायदा अनेकांना होऊ शकतो, असेही ते म्हणाले. मंडळावर अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दुर्लक्षित मंडळ म्हणून गृहनिर्माण मंडळाकडे बघितले जाते. आपल्याला या मंडळाचे महत्त्व वाढवायचे असून मंडळाच्या महसुलातही वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची माहिती साळगावकर यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली आहे. देशतील एकही नागरिक बेघर राहणार नाही, यावर या योजनेद्वारे भर देण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री या नात्याने गोव्यातील लोकांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा व राज्यातही योजनेचा विस्तार करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत मांडणाऱ्या अर्थसंकल्पात गृहनिर्माणासाठी विशेष तरतूद करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात आपण त्यांच्याशी विस्तारितपणे चर्चा केली असल्याची माहिती साळगावकर यांनी देत अर्थसंकल्पासाठी तरतूद करण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आल्याचे सांगितले. गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी आपल्या खात्याचा ताबा घेतल्यानंतर मंत्रालयात गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आपल्या मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेतली.दरम्यान, साळगाव मतदारसंघातील आमदार या नात्याने मतदारसंघातील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण तसेच पाण्याची सोय करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कचरा प्रकल्पात पडून असलेल्या कचऱ्याची लवकरात-लवकर विल्हेवाट लावण्यावर आपला भर राहिल. या कचऱ्यामुळे त्या भागातील पाण्यावर परिणाम झाल्याने त्याला प्राधान्य देण्यात येणार असून मुख्यमंत्री पर्रीकरांसमवेत या प्रकल्पाला भेट दिली असता आपण त्यांचे लक्ष या प्रश्नावर वेधल्याचे साळगावकर या वेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)