शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पदभारानंतर मंत्री अ‍ॅक्शनमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 01:45 IST

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर वसाहती बांधण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मत गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित करण्यात आलेल्या गृहनिर्माण मंडळाला जास्तीत-जास्त महसूल प्राप्त करून देण्याचा व या मंडळातून जास्तीत-जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी सांगितले. मंडळाच्या कार्यक्षेत्राच्या विस्तारावर भर देताना राज्यात आल्वारा पद्धतीचे जे भूखंड आहेत ते भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न गृहनिर्माण मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून या भूखंडाचा फायदा अनेकांना होऊ शकतो, असेही ते म्हणाले. मंडळावर अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दुर्लक्षित मंडळ म्हणून गृहनिर्माण मंडळाकडे बघितले जाते. आपल्याला या मंडळाचे महत्त्व वाढवायचे असून मंडळाच्या महसुलातही वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची माहिती साळगावकर यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली आहे. देशतील एकही नागरिक बेघर राहणार नाही, यावर या योजनेद्वारे भर देण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री या नात्याने गोव्यातील लोकांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा व राज्यातही योजनेचा विस्तार करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत मांडणाऱ्या अर्थसंकल्पात गृहनिर्माणासाठी विशेष तरतूद करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात आपण त्यांच्याशी विस्तारितपणे चर्चा केली असल्याची माहिती साळगावकर यांनी देत अर्थसंकल्पासाठी तरतूद करण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आल्याचे सांगितले. गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी आपल्या खात्याचा ताबा घेतल्यानंतर मंत्रालयात गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आपल्या मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेतली.दरम्यान, साळगाव मतदारसंघातील आमदार या नात्याने मतदारसंघातील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण तसेच पाण्याची सोय करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कचरा प्रकल्पात पडून असलेल्या कचऱ्याची लवकरात-लवकर विल्हेवाट लावण्यावर आपला भर राहिल. या कचऱ्यामुळे त्या भागातील पाण्यावर परिणाम झाल्याने त्याला प्राधान्य देण्यात येणार असून मुख्यमंत्री पर्रीकरांसमवेत या प्रकल्पाला भेट दिली असता आपण त्यांचे लक्ष या प्रश्नावर वेधल्याचे साळगावकर या वेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)