शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पदभारानंतर मंत्री अ‍ॅक्शनमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 01:45 IST

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर वसाहती बांधण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मत गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित करण्यात आलेल्या गृहनिर्माण मंडळाला जास्तीत-जास्त महसूल प्राप्त करून देण्याचा व या मंडळातून जास्तीत-जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी सांगितले. मंडळाच्या कार्यक्षेत्राच्या विस्तारावर भर देताना राज्यात आल्वारा पद्धतीचे जे भूखंड आहेत ते भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न गृहनिर्माण मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून या भूखंडाचा फायदा अनेकांना होऊ शकतो, असेही ते म्हणाले. मंडळावर अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दुर्लक्षित मंडळ म्हणून गृहनिर्माण मंडळाकडे बघितले जाते. आपल्याला या मंडळाचे महत्त्व वाढवायचे असून मंडळाच्या महसुलातही वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची माहिती साळगावकर यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली आहे. देशतील एकही नागरिक बेघर राहणार नाही, यावर या योजनेद्वारे भर देण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री या नात्याने गोव्यातील लोकांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा व राज्यातही योजनेचा विस्तार करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत मांडणाऱ्या अर्थसंकल्पात गृहनिर्माणासाठी विशेष तरतूद करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात आपण त्यांच्याशी विस्तारितपणे चर्चा केली असल्याची माहिती साळगावकर यांनी देत अर्थसंकल्पासाठी तरतूद करण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आल्याचे सांगितले. गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी आपल्या खात्याचा ताबा घेतल्यानंतर मंत्रालयात गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आपल्या मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेतली.दरम्यान, साळगाव मतदारसंघातील आमदार या नात्याने मतदारसंघातील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण तसेच पाण्याची सोय करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कचरा प्रकल्पात पडून असलेल्या कचऱ्याची लवकरात-लवकर विल्हेवाट लावण्यावर आपला भर राहिल. या कचऱ्यामुळे त्या भागातील पाण्यावर परिणाम झाल्याने त्याला प्राधान्य देण्यात येणार असून मुख्यमंत्री पर्रीकरांसमवेत या प्रकल्पाला भेट दिली असता आपण त्यांचे लक्ष या प्रश्नावर वेधल्याचे साळगावकर या वेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)