शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

खाणी सुरू झाल्या, मग ट्रक कुठे आहेत? मायकल लोबोंनी सरकारला केला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2024 12:36 IST

शेती आणि खाण व्यावसाय हा एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील खाण व्यावसाय सुरुच झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी खाणींचा लिलाव होऊन खाण व्यावसाय सुरु झाल्याचे सांगितले. पण पूर्वी खाण व्यावसाय सुरु झाला की राज्यात ट्रक फिरताना दिसायचे तसे आता दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी लक्षवेधी सूचनेवेळी केली.

शेती आणि खाण व्यावसाय हा एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा होता. खाण व्यवसाय जेव्हा सुरु होते तेव्हा सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध व्हायचा. पण आता खाण व्यावसाय सुरु झाल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत, पण पूर्णपणे हा व्यवसाय सुरु झालेला नाही. याचा आर्थिक फटका सामान्य लोकांनाच जास्त बसला आहे, असेही लोबो म्हणाले.

शिक्षण व्यावस्थेवर बोलताना लोबो यांनी सांगितले की, शिक्षण व्यावस्थेचा पाया अंगणवाडी आहे. पण अंगणवाडीच सर्वाधिक दुर्लक्षित आहे. राज्यातील अनेक अंगणवाडीत वीज नाही, पाणी नाही, तर काही ठिकाणी शौचालय देखील नाही. लहान मुलेच अंगणवाडीत जातात त्यामुळे या सुविधा अत्यावश्य असतात. त्यामुळे सर्वात आधी अंगणवाडी विकसीत करणे आवश्यक आहे. खासगी जागेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी देखील सरकारने कायदेशीर पध्दतीने करारबद्द कराव्यात, असे लोबो यांनी सांगितले.

मोपाने नविन ठिकाणावरुन विमाने आपल्या रनवेवर आणली पाहीजे होती, परंतु त्यांनी असे न करता दाबोळीने तयार केलेलाच व्यावसाय हिसकावला आहे. दाबोळीवरील जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय विमाने आपल्या रनवेवर ते उतरवित आहेत.

मोपाने इमॅरेट्स विमाने आपल्याकडे उतरण्यावर भर दिला पाहिजे, यातून त्यांनाही व्यावसाय मिळेल. राज्यात चांगल्या दर्जाचे पर्यटक येणार आणि दाबोळीला देखील महत्व येणार, असे माकलय लोबो यांनी यावेळी सांगितले.

मोपाने दाबोळीचा व्यवसाय हिसकावला

मोपा विमानतळ झाल्यापासून दाबोळी विमानतळाचे महत्व कमी झाले आहे. मोपाने खरंतर नव्याने व्यवसाय सुरु केला पाहीजे होता. नविन ठिकाणांवर विमाने पोहचावयला पाहिजे होती, असे मायकल लोबो विधानसभेत लक्षवेशी सूचनेवेळी म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन