शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

खाणी लवकर अशक्यच

By admin | Updated: March 16, 2015 01:42 IST

पणजी : ८९ खाण लिजधारकांना केंद्राकडून लवकरच पर्यावरणीय परवाने मिळवून देऊन खाणी पूर्ववत सुरू करण्याचे सरकारचे आश्वासन

पणजी : ८९ खाण लिजधारकांना केंद्राकडून लवकरच पर्यावरणीय परवाने मिळवून देऊन खाणी पूर्ववत सुरू करण्याचे सरकारचे आश्वासन निव्वळ जिल्हा पंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मते प्राप्त करण्यासाठीच असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी, अर्थतज्ज्ञ तसेच इतर घटकांकडून होत आहे. आणखी दीड वर्ष तरी खाणी सुरू होणे अशक्यच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मायनिंग पीपल्स फ्रंटनेही या आश्वासनाचा धिक्कार केला आहे. बेकायदा खाणींविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन लढा दिलेले गोवा फाउंडेशनचे संस्थापक क्लॉड अल्वारिस म्हणाले की, याआधी पर्रीकरांनीही अनेकदा अशीच आश्वासने दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये काही मर्यादा आणि अटी घालून खाणी सुरू करण्याचा आदेश दिला आहे. वर्षभर काहीच होऊ शकले नाही. खाणींच्या बाबतीत यापुढे वाकडे काहीच चालणार नाही, जो योग्य पद्धतीने सर्व कायदे पाळून परवाने घेईल त्यालाच खाणी सुरू करता येतील. झटपट ते शक्यच नाही, त्यासाठी बराच कालावधी जाईल. आम्ही कायदेशीर खाणींच्या विरोधात नाही; परंतु बेकायदा कोणी काही केले तर ते मात्र आता लोकही खपवून घेणार नाहीत. सरकार खाणी सुरू करण्यास जेवढी उत्सुकता दाखवते, तितकीच उत्सुकता खाण व्यवसायात ज्यांनी घोटाळे केले त्यांच्यावर कारवाईबाबत का दाखवत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला. राणे व कामत सरकारने विलंबाची माफी दिलेल्या आणि वादात असलेल्या ४0 पैकी काही खाण लिजांचे नूतनीकरण कसे केले, असा प्रश्नही त्यांनी केला. आश्वासन निवडणुकीतील गाजर गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने हे आश्वासन म्हणजे निवडणुकीत गाजर दाखवण्याचा प्रकार आहे, अशी टीका करून संभावना केली आहे. लोकांना सरकारने मूर्ख बनवू नये, असे निमंत्रक सुहास नाईक म्हणतात. मेरशी येथे लोकसभा निवडणुकीआधी मोदींच्या जाहीर सभेत असेच आश्वासन दिले होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्रात भाजपची सत्ता येऊन १0 महिने उलटले तरी काहीच होऊ शकलेले नाही. (पान २ वर)