शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

...तर डिसेंबरमध्ये खाणी बंद!

By admin | Updated: October 14, 2015 01:31 IST

पणजी : नव्याने सुरू झालेला राज्यातील खनिज खाण व्यवसाय हळूहळू वेग घेत आहे; पण टाकाऊ खनिज माल लिज क्षेत्राबाहेर टाकण्याच्या विषयाबाबत केंद्र सरकारने कायदेशीर

पणजी : नव्याने सुरू झालेला राज्यातील खनिज खाण व्यवसाय हळूहळू वेग घेत आहे; पण टाकाऊ खनिज माल लिज क्षेत्राबाहेर टाकण्याच्या विषयाबाबत केंद्र सरकारने कायदेशीर तोडगा काढला नाही, तर सुरू झालेल्या खाणी येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा बंद होऊ शकतात, अशी भीती खनिज व्यावसायिकांना सतावत आहे. तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत सर्व खनिज कंपन्या लिज क्षेत्राबाहेर टाकाऊ खनिज माल टाकत होत्या. मात्र, तशी पद्धत आता बेकायदा ठरते. त्यामुळे लिज क्षेत्राबाहेर ‘रिजेक्ट्स’ टाकता येत नाही. सध्या सेसा गोवा व अन्य काही कंपन्यांनी खनिज व्यवसाय नव्याने सुरू केला आहे; पण जो टाकाऊ खनिज माल असतो, तो ठेवावा कुठे, असा प्रश्न कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या कमी प्रमाणात माल असल्याने तो लिज क्षेत्रातच ठेवला जातो; पण डिसेंबरनंतर टाकाऊ खनिज मालाचे प्रमाण खूप होईल व त्या वेळी लिज क्षेत्राबाहेर जर हा माल ठेवण्यास मुभा मिळाली नाही, तर सुरू झालेल्या खनिज खाणी बंद करण्याची वेळ येऊ शकते, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. सेसा गोवा कंपनीने आपल्या दहा लिज क्षेत्रांमध्ये खाण व्यवसाय सुरू केला आहे. सुर्ल-साखळी, डिचोली, कोडली अशा ठिकाणी ही लिज क्षेत्रे आहेत. शिवाय सोनशी येथील खाणही सेसाकडूनच चालविली जाते. अन्य कंपन्यांनीही आता प्रत्यक्ष उत्खनन सुरू केले आहे. लिज क्षेत्राबाहेर डंप टाकता यावेत म्हणून केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी व त्यासाठी वटहुकूम जारी करावा, अशा मागण्या काही खनिज व्यावसायिकांनी यापूर्वी केल्या आहेत. (खास प्रतिनिधी)