शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

...तर डिसेंबरमध्ये खाणी बंद!

By admin | Updated: October 14, 2015 01:31 IST

पणजी : नव्याने सुरू झालेला राज्यातील खनिज खाण व्यवसाय हळूहळू वेग घेत आहे; पण टाकाऊ खनिज माल लिज क्षेत्राबाहेर टाकण्याच्या विषयाबाबत केंद्र सरकारने कायदेशीर

पणजी : नव्याने सुरू झालेला राज्यातील खनिज खाण व्यवसाय हळूहळू वेग घेत आहे; पण टाकाऊ खनिज माल लिज क्षेत्राबाहेर टाकण्याच्या विषयाबाबत केंद्र सरकारने कायदेशीर तोडगा काढला नाही, तर सुरू झालेल्या खाणी येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा बंद होऊ शकतात, अशी भीती खनिज व्यावसायिकांना सतावत आहे. तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत सर्व खनिज कंपन्या लिज क्षेत्राबाहेर टाकाऊ खनिज माल टाकत होत्या. मात्र, तशी पद्धत आता बेकायदा ठरते. त्यामुळे लिज क्षेत्राबाहेर ‘रिजेक्ट्स’ टाकता येत नाही. सध्या सेसा गोवा व अन्य काही कंपन्यांनी खनिज व्यवसाय नव्याने सुरू केला आहे; पण जो टाकाऊ खनिज माल असतो, तो ठेवावा कुठे, असा प्रश्न कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या कमी प्रमाणात माल असल्याने तो लिज क्षेत्रातच ठेवला जातो; पण डिसेंबरनंतर टाकाऊ खनिज मालाचे प्रमाण खूप होईल व त्या वेळी लिज क्षेत्राबाहेर जर हा माल ठेवण्यास मुभा मिळाली नाही, तर सुरू झालेल्या खनिज खाणी बंद करण्याची वेळ येऊ शकते, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. सेसा गोवा कंपनीने आपल्या दहा लिज क्षेत्रांमध्ये खाण व्यवसाय सुरू केला आहे. सुर्ल-साखळी, डिचोली, कोडली अशा ठिकाणी ही लिज क्षेत्रे आहेत. शिवाय सोनशी येथील खाणही सेसाकडूनच चालविली जाते. अन्य कंपन्यांनीही आता प्रत्यक्ष उत्खनन सुरू केले आहे. लिज क्षेत्राबाहेर डंप टाकता यावेत म्हणून केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी व त्यासाठी वटहुकूम जारी करावा, अशा मागण्या काही खनिज व्यावसायिकांनी यापूर्वी केल्या आहेत. (खास प्रतिनिधी)