शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

म्हादई प्रश्न विधानसभेत तापणार; विरोधी आमदार आक्रमक, सरकारच्या अपयशाबद्दल टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2024 12:28 IST

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही म्हादईच्या प्रश्नावर आम्ही सरकारला येत्या विधानसभा अधिवेशनात घेरणार, असे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई प्रश्नावर विधानसभा अधिवेशनात सरकारच्या अपयशाचे वाभाडे काढू, असा इशारा विरोधी आमदारांनी दिला आहे. कर्नाटक काँग्रेस सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केल्याने त्याचे पडसाद गोव्यात विरोधी पक्षांमध्ये उमटू लागले आहेत. 

आमदार विजय म्हणाले की, म्हादईच्या प्रश्नावर आम्ही विधानसभेत सरकारला सभागृह समिती स्थापन करण्यास भाग पाडले. परंतु या समितीची केवळ एकच बैठक झाली. केंद्राने नेमलेल्या 'प्रवाह' प्राधिकरणाचे अधिकारी आता पावसाळ्यात पाहणी करण्यासाठी येत आहेत. खरे तर ही पाहणी उन्हाळ्यात व्हायला हवी होती. तेव्हाच कर्नाटकने पाणी वळवले की नाही, हे उघड झाले असते. म्हादई सांभाळण्यासाठी या सरकारकडे इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच आम्ही लढा हरतो. सावंत सरकार म्हादई विकायला निघाले आहे. सरकारचा हा खोटारडेपणा यापुढे चालणार नाही. आम्ही या प्रश्नावर प्रखरपणे विधानसभेत आवाज उठवणार आहोत.

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनीही म्हादईच्या प्रश्नावर आम्ही सरकारला येत्या विधानसभा अधिवेशनात घेरणार, असे सांगितले. कळसा-भांडुरा प्रकल्पाचा डीपीआर मागे घेण्याची मागणी करण्यासाठी सावंत सरकार अजून पंतप्रधान मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेऊ शकलेले नाही, ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या या अपयशाबद्दल फटकारताना युरी यांनी म्हादई प्रश्नावर गोव्याचे हित जपण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यात सरकार कमी पडल्याची टीका केली. कर्नाटकात भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी गोव्यातील भाजप सरकारने यापूर्वीच जीवनदायिनी म्हादईचा सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला.

विजय सरदेसाई पुढे म्हणाले की, 'म्हादईच्या प्रश्नावर आम्ही विधानसभेत सरकारला सभागृह समिती स्थापन करण्यास भाग पाडले. परंतु या समितीची केवळ एकच बैठक झाली. केंद्राने नेमलेल्या 'प्रवाह' प्राधिकरणाचे अधिकारी आता पावसाळ्यात पाहणी करण्यासाठी येत आहेत. खरे तर ही पाहणी उन्हाळ्यात व्हायला हवी होती. तेव्हाच कर्नाटकने पाणी वळवले की नाही, हे उघड झाले असते. म्हादई सांभाळण्यासाठी या सरकारकडे इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच आम्ही लढा हरतो. सावंत सरकार म्हादई विकायला निघाले आहे. सरकारचा हा खोटारडेपणा यापुढे चालणार नाही. आम्ही या प्रश्नावर प्रखरपणे विधानसभेत आवाज उठवणार आहोत.'

भाजप-काँग्रेस उदासीन : बोरकर

म्हादई ही आमच्या हातातून निसटत आहे. राज्य सरकारकडून देखील म्हादई वाचविण्यासाठी कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. विधानसभेत जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती, या समितीची एकही बैठक झालेली नाही. जलस्रोत मंत्र्यांकडूनच या विषयात स्पष्टता दिसत नाही. म्हादईवर कळसा-भांडुरा प्रकल्पाची पूर्ण तयारी कर्नाटक सरकारने केली आहे. राज्यातील काँग्रेस पक्षही म्हादई वाचविण्यासाठी गंभीर नाही, असा आरोप आमदार वीरेश बोरकर यांनी केला. कर्नाटक काँग्रेस सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केल्याने त्याचे पडसाद गोव्यात विरोधी पक्षांमध्ये उमटू लागले आहेत.

सरकारने सौदा केला

युरी यांनी म्हादई प्रश्नावर गोव्याचे हित जपण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यात सरकार कमी पडल्याची टीका केली. कर्नाटकात भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी गोव्यातील भाजप सरकारने यापूर्वीच जीवनदायिनी म्हादईचा सौदा केल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारचे दुर्दैव...

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की. म्हादईच्या बाबतीत गोव्याची बाजू केंद्राकडे मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले. डबल इंजिन सरकार असूनही सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधानांची साधी वेळ मिळू शकलेली नाही, हे मोठे दुर्दैव आहे.

 

टॅग्स :goaगोवा