शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

गोवा भ्रष्टाचारमुक्त करू : केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 21:49 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे केली.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 22- गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही, ते एक आंदोलन आहे. गोवा भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. गोव्यातील भाजप सरकारने काँग्रेसची भ्रष्ट राजवटच पुढे चालू ठेवली आहे. भ्रष्टाचार, कॅसिनो आणि खाणींच्या प्रश्नांबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे केली.

गोवा भ्रष्टाचारमुक्त करण्याची ग्वाही त्यांनी दिली. येथील कांपाल मैदानावर केजरीवाल यांची जाहीर सभा झाली. ‘आप’तर्फे सहा महिने येथे जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. चाळीसही मतदारसंघांत आपचे उमेदवार उभे केले जातील, असे पक्षाने यापूर्वी जाहीर केलेले आहे. सर्व मतदारसंघांत आपचे समन्वयक जाहीर झालेले आहेत. हेल्पलाईन क्रमांकही लोकांना दिलेला आहे. मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटींवर पक्षाने भर दिलेला आहे. त्यासाठी दारोदारी पक्षाचे कार्यकर्ते जात आहेत. या सर्वांचा परिणाम आजच्या सभेच्या लक्षणीय उपस्थितीत झाला. केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये पक्षाची झालेली वाटचाल कथन केली. माध्यमांसह सर्व पक्षांनी आमच्या पक्षाची कशी खिल्ली उडवली ते सांगितले. तसेच आपच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त होईल, अशी भाकिते रंगवली, अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, ते माझी टिंगल करत नव्हते तर आम आदमीच्या ताकदीची टिंगल करत होते. या आम आदमीच्या मनात भ्रष्टाचाराच्या विरोधात असंतोष धगधगत होता. तो निकालातून दिसून आला, गोव्यातही हे होऊ शकते. केजरीवाल यांनी स्वत:च्या मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या विषयावरून कसे हाकलले तो अनुभव सांगितला. आम्ही त्याला वाचवू शकलो असतो; पण तोच काय, माझा मुलगा जरी असला तरी मी माफ करणार नाही, असे त्यांना ठणकावून सांगितले.

स्वत:च्या मंत्र्याला लाच घेतली म्हणून नव्हे तर लाच मागितली म्हणून आम्ही सीबीआयच्या स्वाधीन केले, देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले. केजरावील यांच्या सभेला लक्षणीय उपस्थिती होती. तळपत्या उन्हात लोक तीन-चार वाजल्यापासून आले होते. महिलांची संख्याही खूप होती. आम आदमी जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद यासारख्या गाण्यांनी परिसर दणाणून सोडला होता. प्रारंभी आपच्या गोव्यातील स्थानिक कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्यांनी सत्तारूढ भाजप सरकारचे वाभाडे काढले. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी काय सांगितले आणि प्रत्यक्ष यू टर्न कसे घेतले, याचा पाढा वक्त्यांनी वाचला.