शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पेड क्वारंटाईनच्या नावाखाली गोवा सरकारची लूटमार?- डिक्सन वाझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:00 IST

डीजी शिपिंगनेही जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यात विलगिकरणासाठी पैसे आकारण्याची तजवीज नाही.

मडगाव: कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने राज्यात जी ' पेड क्वारान्टीन' सुविधा सुरू केली आहे ती कायदेशीर का? की ही अडचणीत सापडलेल्या नागरिकांची केलेली लूटमार? हजारो खलाशी आता गोव्यात येण्याच्या वाटेवर असताना हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एक गोवा राज्य सोडल्यास इतर कुठेही  क्वारान्टीन करण्यासाठी पैसे आकारले जात नाही. डीजी शिपिंगनेही जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यात विलगिकरणासाठी पैसे आकारण्याची तजवीज नाही.

या संबंधी बोलताना ऍड. क्लीओफात कुतीन्हो म्हणाले, ज्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कक्षेत परिस्थिती हाताळली जाते त्यावेळी अशा सुविधा देणे सरकारची जबाबदारी असते, सरकारी विलगिकरण केंद्रे स्थापण्याची गरज असून जर कुणाला या केन्द्रात राहायचे नसल्यास त्यांना सशुल्क विलगिकरणाचा पर्याय देणे आवश्यक आहे.

मात्र सध्या गोव्यात प्रत्येकाला विलीगिकरणाच्या नावाखाली हॉटेलात ठेवले जात असून त्या व्यक्तीकडून किंव्हा त्यांच्या कंपनीकडून सक्तीने पैसे वसूल केले जात आहेत. कुटबण जेटीवरील 20 कामगारांना अशाच प्रकारे मडगाव रेसिडेंटित आणून ठेवले होते. त्यांच्या मालकाकडून दरडोई दर दिवसासाठी प्रत्येकी 2500 रुपये वसूल करण्यात आले होते.

ही एकप्रकारे लुटच अशी प्रतिक्रिया गोवन सीमेन संघटनेचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी व्यक्त केली. देशात अन्य कोणत्याही ठिकाणी अशी वसुली केली जात नसताना केवळ गोवा सरकारने कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला असे ते म्हणाले. इतर कुठल्याही राज्यातील खलाशासाठी अतिरिक्त पैसे घेत नसताना केवळ गोव्यातील खलाशाकडूनच हे पैसे वसूल केले जात असल्याने भविष्यात त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात असे ते म्हणाले. आम्ही  गोवा सरकारच्या नजरेस आणून दिले आहे असे त्यांनी सांगितले.

आम्हाला होम क्वारंटाईन करा; कर्णिका जहाजावरील खलाशांची मागणी

कर्णिका जहाजावर सध्या मुंबईत अडकून असलेल्या 93 खलाशानी आपल्याला पेड क्वारंटाईन करण्याऐवजी घरातच विलग ठेवा अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. आपण यापूर्वीच 42 दिवस जहाजावर क्वारान्टीन झालेलो आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

गोवन सिफेरर संघटनेचे कॅ. वेंझी व्हिएगस यांनीही डीजी शिपिंगच्या  मार्गदर्शक तत्वाचा हवाला देऊन खलाशाना 14 दिवस क्वारान्टीन करण्याची गरज आहे. जहाजावर जे अडकून आहेत ते त्याहीपेक्षा अधिक दिवस क्वारान्टीन अवस्थेत असल्याने त्यांना गोव्यात आल्यावर पुन्हा विलगिकरण केंद्रात ठेवण्याची  गरज नाही असे सांगत सध्या 12 जहाजे खलाशाना घेऊन भारताच्या दिशेने येत आहेत. विलगिकरणाचा अवधी पूर्ण व्हावा यासाठी ते मुद्दामहून कमी गतीने येत आहेत. अशा खलाशाना परत विलग करून ठेवणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल असे ते म्हणाले.

दरम्यान,  गोव्यात येणाऱ्या खलाशाना विलग करून ठेवण्यासाठी पैसे आकारले जाऊ नयेत अशी मागणी कुंकळीचे आमदार क्लाफास डायस यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या