शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

‘लोकमत’च्या नि:पक्ष पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:23 IST

आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संपादक राजू नायक यांचे अभिनंदन

पणजी : दै. ‘लोकमत’च्या नि:पक्ष व निर्भिड पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव करण्यात आला. गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विधानसभेत अभिनंदन करण्यात आले.कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सासवड-पुणे येथे अत्रे प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकताच हा पुरस्कार देण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.ठरावावर बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, ‘राजू नायक हे तत्त्वश: नेहमी माझ्या विरुद्ध भूमिका घेणारे; पण त्यांनी कधीच दोघांमध्ये शत्रुत्व येऊ दिले नाही. विरोधक असूनही एखाद्या माणसाबरोबर चांगले संबंध कसे ठेवावेत हे त्यांच्याकडून शिकावे. काही चुकीच्या गोष्टी छापून आल्या तर ज्या काही निवडक संपादकांना मी फोन करून सत्य सांगतो, त्यातील एक राजू नायक आहेत. ते ऐकूनही घेतात आणि नंतर वस्तुस्थितीही मांडतात.’विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, ‘राजू नायक यांची निर्भीड पत्रकारिता आदर्शवत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने या क्षेत्रात येऊ पाहणाºया नव्या पिढीचे मनोबल वाढेल.’आमदार दिगंबर कामत म्हणाले, ‘१९९४ साली मडगाव मतदारसंघात राजू माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले; पण आमची मैत्री कायम राहिली. ‘सुनापरान्त’चे संपादक असतानापासून आजतागायत ते लिखाणातून परखडपणे विचार मांडतात. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर अनेकदा प्रखरपणे टीका केली; परंतु संबंधांमध्ये कधीच कटुता येऊ दिली नाही.’कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘राजू नायक यांनी नेहमीच लोकांची बाजू लेखनातून लढविली. सामाजिक, राजकीय, पर्यावरण या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने युवा पत्रकारांचे मनोबल वाढणार आहे.’

‘लोकमत’शिवाय चैन पडत नाही : पर्यटनमंत्रीपर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, ‘राजू नायक संपादक असलेले ‘लोकमत’ वर्तमानपत्र सकाळी वाचल्याशिवाय चैन पडत नाही. खासकरून कुजबुज हा स्तंभ वाचनीय असतो. राजू व मी तळागाळातून वर आलो. दोघेही मित्र आहोत. त्यांनी प्रत्येक विषय कोणाचीही पर्वा न करता धाडसाने हाताळला. मडगावमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी मी लढा दिला तेव्हा संपूर्ण शहर माझ्या विरोधात गेले. राजू नायक यांनीही विरोधात लिहिले; परंतु आमच्या संबंधांमध्ये कधी कटुता येऊ दिली नाही.’