शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या नि:पक्ष पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 21:08 IST

आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संपादक राजू नायक यांचे अभिनंदन

पणजी : दै. ‘लोकमत’च्या नि:पक्ष व निर्भिड पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव करण्यात आला. गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विधानसभेत अभिनंदन करतानाच ‘लोकमत’ने चालविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल सदस्यांनी गौरवोद्गार काढले.कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सासवड-पुणे येथे अत्रे प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकताच हा पुरस्कार देण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.ठरावावर बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, ‘राजू नायक हे तत्त्वश: नेहमी माझ्या विरुद्ध भूमिका घेणारे; पण त्यांनी कधीच दोघांमध्ये शत्रुत्व येऊ दिले नाही. विरोधक असूनही एखाद्या माणसाबरोबर चांगले संबंध कसे ठेवावेत हे त्यांच्याकडून शिकावे. काही चुकीच्या गोष्टी छापून आल्या तर ज्या काही निवडक संपादकांना मी फोन करून सत्य सांगतो, त्यातील एक राजू नायक आहेत. ते ऐकूनही घेतात आणि नंतर वस्तुस्थितीही मांडतात.’विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, ‘राजू नायक यांची निर्भीड पत्रकारिता आदर्शवत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने या क्षेत्रात येऊ पाहणाºया नव्या पिढीचे मनोबल वाढेल.’आमदार दिगंबर कामत म्हणाले, ‘१९९४ साली मडगाव मतदारसंघात राजू माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले; पण आमची मैत्री कायम राहिली. ‘सुनापरान्त’चे संपादक असतानापासून आजतागायत ते लिखाणातून परखडपणे विचार मांडतात. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर अनेकदा प्रखरपणे टीका केली; परंतु संबंधांमध्ये कधीच कटुता येऊ दिली नाही.’कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘राजू नायक यांनी नेहमीच लोकांची बाजू लेखनातून लढविली. सामाजिक, राजकीय, पर्यावरण या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने युवा पत्रकारांचे मनोबल वाढणार आहे.’

‘लोकमत’शिवाय चैन पडत नाही : पर्यटनमंत्रीपर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, ‘राजू नायक संपादक असलेले ‘लोकमत’ वर्तमानपत्र सकाळी वाचल्याशिवाय चैन पडत नाही. खासकरून कुजबुज हा स्तंभ वाचनीय असतो. राजू व मी तळागाळातून वर आलो. दोघेही मित्र आहोत. त्यांनी प्रत्येक विषय कोणाचीही पर्वा न करता धाडसाने हाताळला. मडगावमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी मी लढा दिला, तेव्हा राजू नायक लेखणी तलवारीसारखे वापरत होते. त्यामुळे संपूर्ण शहर माझ्या विरोधात गेले. राजू नायक यांनी सातत्याने प्रखरपणे विरोधात लिहिले; परंतु आमच्या संबंधांमध्ये कधी कटुता येऊ दिली नाही. त्यांनी लेखणी नेहमी समाजाच्या भल्यासाठी वापरली.