शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

किनारी भागातील गैरसोयी दूर करू

By admin | Updated: May 18, 2017 02:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपेडणे : पेडणे तालुक्यांतील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात कोणत्याही गैरसोयी दूर झाल्या नाहीत. स्वच्छतागृहांसह

लोकमत न्यूज नेटवर्कपेडणे : पेडणे तालुक्यांतील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात कोणत्याही गैरसोयी दूर झाल्या नाहीत. स्वच्छतागृहांसह सर्व सोयीसुविधा आगामी काळात पूर्ण केल्या जातील, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शहरातील पर्यटक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी नवीन पर्यटनस्थळे विकसित केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. किनारी भागात बेकायदा व्यवहारांना मुळीच थारा दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.सध्या पेडणे तालुक्यातील पर्यटन हंगाम संपुष्टात आला असून साहित्याचे पॅकिंग सुरू आहे. विदेशी पर्यटकांना आपल्या देशात परतीचे वेध लागले आहेत, त्यामुळे अनेक पर्यटन हंगामातील किनारी कुटिरे रेस्टॉरंट बंद केली आहेत. प्लास्टिक आच्छादने घालून आपला व्यवसाय बंद केला तो नवीन पर्यटन हंगाम येण्याची प्रतीक्षा करण्याच्या आशेने, तर काही जणांनी जागा आरक्षित करून आतापासूनच बांधकामे करून पुढच्या हंगामात व्यवसाय थाटण्याच्या दृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. किनारे सुने-सुनेविदेशी पर्यटक परतीकडे निघाल्याने किनाऱ्यांवर गर्दी कमी दिसते. किनारे सुने-सुने वाटतात. काही खासगी जागेतील रेस्टॉरंटमध्ये काही पर्यटकांची वर्दळ दिसते ती केवळ समुद्रस्नानासाठी. समुद्रस्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. आंघोळीसाठी दरवर्षी पिर्ण येथून येणाऱ्या ज्योती परब यांनी सांगितले की, आपण दरवर्षी मोरजी किनारी औषधी खाऱ्या पाण्याच्या आंघोळीसाठी येते. दरवर्षी किनाऱ्याचा चेहरा-मोहरा बदललेला असतो. मात्र, आजपर्यंत कोणतीच सोय नसल्याने आमचे हाल होतात. आमचे नातलग जवळच किनारी भागात असल्याने तेवढी अडचण येत नाही. मात्र, इतरांना विशेषत: जी अडचण येते, ती शब्दांत सांगता येत नाही. दरम्यान, किनारी भागात पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी ते संपेपर्यंत मोरजी, आश्वे-मांद्रे व हरमल या भागात राजरोसपणे बेकायदा संगीत रजनी आयोजित करून स्थानिकांना त्रास दिला जातो. अनेक लेखी तक्रारी करूनही आजपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही, त्यांच्या विरोधात तक्रारी करूनही गुन्हा नोंद केला नाही.