शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मत्स्यपालनासाठी खाजन शेतीत अडवलेले पाणी सोडा

By admin | Updated: February 25, 2015 03:00 IST

फोंडा : करंजाळ-मडकई येथील खाजन शेतीत मासेमारी करण्यासाठी पाणी अडवून ठेवले जात आहे.

फोंडा : करंजाळ-मडकई येथील खाजन शेतीत मासेमारी करण्यासाठी पाणी अडवून ठेवले जात आहे. त्यामुळे या भागातील घरे, तसेच प्राथमिक विद्यालय आणि देवस्थान सभागृहाला धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी संबंधित अधिकारी वर्गाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई तसेच उपाययोजना केली जात नसल्यामुळे मंगळवारी करंजाळ येथील दहाजण समाजाच्या लोकांनी फोंडा मामलेदार कार्यालयात येऊन निवेदन दिले. याबाबत संकल्प फडते यांनी सांगितले की, करंजाळ येथे पारंपरिक खाजन शेतीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा मासेमारी सुरू आहे. त्यासाठी नदीचे पाणी शेतात घेऊन अडवून ठेवले जाते. त्यामुळे या भागातील घरांना धोका निर्माण झाला आहे. काही भागातील कडा कोसळू लागल्या आहेत. या शेतीलगतच प्राथमिक शाळा असून देवस्थान सभागृहही आहे. पाणी अडवून ठेवण्याचा प्रकार सुरूच राहिल्यास या शाळा आणि सभागृहाला धोका निर्माण होणार आहे. मामलेदार कार्यालयाने शेतीची त्वरित पाहणी करून अडवून ठेवलेले पाणी सोडून संभाव्य धोका टाळण्याची करंजाळ दहाजण समाजाची मागणी आहे. मामलेदार राशोल फर्नांडिस यांनी बुधवारी पाहणी करण्याचे आश्वासन दिल्याचे संकल्प फडते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)