शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नौदलासाठी गोव्यात प्राचीन तंत्राचा वापर करून बोट बांधकामाचा केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते शुभारंभ

By किशोर कुबल | Updated: September 12, 2023 14:27 IST

Goa: नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून  बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे. 

- किशोर कुबल दिवाडी - नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून  बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे.  केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आज या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

दिवाडी येथील होडी इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जहाज बांधणी कंपनी, भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि भारतीय नौदलाने या संबंधी अलीकडेच त्रिपक्षीय करार केला आहे. भारताचा प्राचीन सागरी वारसा पुनरुज्जीवित करणे हा या मागचा उद्देश आहे.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, भारताला खूप समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा आहे. जी आधुनिक भारतातली मोठ्या वर्गाला माहीत नाही. म्हणूनच  प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाईल'

नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले की,  'भारतीय नौदलाने नेहमीच देशाच्या  समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरेचे समर्थन केले आहे. भारत सरकारच्या या ऐतिहासिक प्रकल्पात सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे.'

प्रकल्पाविषयी तपशीलवार माहिती देताना, होडी इनोव्हेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रथमेश दांडेकर म्हणाले, की, ' लाकडावर पारंपरिक डिंक आणि तेल वापरुन प्राचीन तंत्रांचा वापर करून काळजीपूर्वक जहाज बांधून भारताच्या समृद्ध सागरी परंपरेला पुनरुज्जीवित करणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.बोट बांधून पूर्ण झाली की ऐतिहासिक व्यापारी मार्गांचा मागोवा घेत तीप्रवासाला निघणर आहे.' 

जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान तब्बल दोन हजार वर्षे जुने आहे. ही कला  पुनरुज्जीवित करणे हा हेतू आहे. पुरातन काळात महासागरात जाणाऱ्या जहाजांच्या बांधकामासाठी या तंत्रज्ञान वापर केला जात असे. २०२५ साली  भारतीय नौदल या बोटीवरुन  परिक्रमा करील,  अशी योजना आहे.  पंतप्रधान आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. ते म्हणाले की, भारताला मोठी सागरी परंपरा आहे. जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान युरोपियन जहाजे भारतात येईपर्यंत अस्तित्वात होते. नंतर ते लोप पावले. १८ महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. नंतर सहा महिने चाचणी घेतली जाईल व दोन वर्षात ही बोट प्रतिक्रियेसाठी सज्ज होईल. कार्यक्रमाला नौदल कर्मचारी आणि इतर  अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाindian navyभारतीय नौदल