शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नौदलासाठी गोव्यात प्राचीन तंत्राचा वापर करून बोट बांधकामाचा केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते शुभारंभ

By किशोर कुबल | Updated: September 12, 2023 14:27 IST

Goa: नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून  बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे. 

- किशोर कुबल दिवाडी - नौदलासाठी प्राचीन तंत्राचा वापर करून  बोट बांधण्याचा अनोखा उपक्रम गोव्यातील या छोट्या बेटावर हाती घेतला आहे. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाणार आहे.  केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते आज या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

दिवाडी येथील होडी इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही जहाज बांधणी कंपनी, भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि भारतीय नौदलाने या संबंधी अलीकडेच त्रिपक्षीय करार केला आहे. भारताचा प्राचीन सागरी वारसा पुनरुज्जीवित करणे हा या मागचा उद्देश आहे.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, भारताला खूप समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरा आहे. जी आधुनिक भारतातली मोठ्या वर्गाला माहीत नाही. म्हणूनच  प्राचीन तंत्राचा वापर करून जहाज तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. ही बोट बांधून पूर्ण झाल्यावर सागरी परिक्रमाही आयोजित केली जाईल'

नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले की,  'भारतीय नौदलाने नेहमीच देशाच्या  समृद्ध आणि प्राचीन सागरी परंपरेचे समर्थन केले आहे. भारत सरकारच्या या ऐतिहासिक प्रकल्पात सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे.'

प्रकल्पाविषयी तपशीलवार माहिती देताना, होडी इनोव्हेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रथमेश दांडेकर म्हणाले, की, ' लाकडावर पारंपरिक डिंक आणि तेल वापरुन प्राचीन तंत्रांचा वापर करून काळजीपूर्वक जहाज बांधून भारताच्या समृद्ध सागरी परंपरेला पुनरुज्जीवित करणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.बोट बांधून पूर्ण झाली की ऐतिहासिक व्यापारी मार्गांचा मागोवा घेत तीप्रवासाला निघणर आहे.' 

जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान तब्बल दोन हजार वर्षे जुने आहे. ही कला  पुनरुज्जीवित करणे हा हेतू आहे. पुरातन काळात महासागरात जाणाऱ्या जहाजांच्या बांधकामासाठी या तंत्रज्ञान वापर केला जात असे. २०२५ साली  भारतीय नौदल या बोटीवरुन  परिक्रमा करील,  अशी योजना आहे.  पंतप्रधान आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. ते म्हणाले की, भारताला मोठी सागरी परंपरा आहे. जहाज 'स्टिचिंग'चे प्राचीन तंत्रज्ञान युरोपियन जहाजे भारतात येईपर्यंत अस्तित्वात होते. नंतर ते लोप पावले. १८ महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. नंतर सहा महिने चाचणी घेतली जाईल व दोन वर्षात ही बोट प्रतिक्रियेसाठी सज्ज होईल. कार्यक्रमाला नौदल कर्मचारी आणि इतर  अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाindian navyभारतीय नौदल