शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

उत्तरेच्या निकालाबाबत लोकांत औत्सुक्य कमी

By admin | Updated: May 16, 2014 01:06 IST

पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत उत्तर गोव्यातील लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत जनतेत औत्सुक्य कमी आहे.

पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत उत्तर गोव्यातील लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत जनतेत औत्सुक्य कमी आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात लढत एकतर्फीच झाली असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे. भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यात किती मतांची आघाडी मिळतेय याकडेच उत्तर गोवा भाजपचे लक्ष लागून आहे. भाजपने या वेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त पैसा खर्च केला. ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीय मतदार पूर्णपणे भाजपच्या बाजूने राहिले, असा निष्कर्ष काढण्यासारखी स्थिती उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातही आहे. मात्र, उत्तर गोव्यातही महिलांनी जास्त प्रमाणात मतदान केले आहे. हिंदू बहुसंख्य असलेल्या उत्तर गोव्यातील अनेक मतदारसंघांत खासदार श्रीपाद नाईक यांना लोकांनी मतदान केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिणामही उत्तरेतील अशा काही तालुक्यांमध्ये निवडणूक काळात दिसून आला. बहुतांश ख्रिस्ती धर्मगुरू काँग्रेसच्या बाजूने राहिले. पर्रीकर सरकारवर जे घटक नाखूश होते, त्यांनी उत्तरेतही भाजपच्या विरोधात मतदान केले; पण याच सरकारने आणलेल्या काही योजनांमुळे महिलावर्गाने भाजपला एकगठ्ठा मते दिली, असेही मानले जात आहे. केंद्रात मोदी सरकार आले तर गोव्यातील खनिज व्यवसाय सुरू होईल, असे वाटल्यानेही उत्तर गोव्यातील खाणग्रस्त भागांतील मतदार भाजपच्या बाजूने राहिले, असे मानणारे लोक अनेक आहेत. भाजपची उत्तर गोव्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. श्रीपाद नाईक यांच्याविषयी अ‍ॅण्टी इनकम्बन्सी होती; पण संघटना ठामपणे नाईक यांच्या बाजूने राहिली. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष पूर्णपणे फिका पडला. काँग्रेसचे उमेदवार रवी नाईक आणि जॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष यांचा परस्परांशी मोठासा संबंध नाही, असा अनुभव निवडणुकीवेळी जनतेला आला. काँग्रेसच्या काही सभाही निवडणुकीवेळी फ्लॉप ठरल्या. काही आमदारांनी कामही केले नाही. गोमंतक भंडारी समाजातीलही बहुसंख्य मते भाजप उमेदवाराच्या बाजूने गेली, असे मानले जात आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार डॉ. दत्ताराम देसाई व अपक्ष उमेदवार दयानंद नार्वेकर यांना लोकांनी किती मते दिली आहेत, तेही शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. (खास प्रतिनिधी)