शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

गोव्यात ‘क्यार’ वादळाचा धोका टळला; पण अतिवृष्टीनं जनजीवन विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 18:44 IST

अनेक ठिकाणी पडझड; पूरस्थिती आणि वाहतुकीचीही कोंडी 

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले ‘क्यार’ वादळ अखेर घोंघावत किनारपट्टीपासून नेमक्या उलट्या दिशेने पश्चिमेकडे वेगाने सरकत असून यामुळे किनारपट्टीवरील वादळाचा धोका टळला. मात्र अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे झालेली पडझड यामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाले. नद्या, नाल्यांची पातळी वाढल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच वीज पुरवठाही खंडित झाला. वाहनांची कोंडी होऊन रस्ते तुंबण्याचे प्रकारही घडले. हवामान वेधशाळेने समुद्रातील क्यार वादळाचा परिणाम म्हणून पुढील २४ तास राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार यांनी किनारपट्टीला वादळाचा धोका टळला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, समुद्रात कमी दाबाच्या पट्टयाचे पहाटे तीव्र वादळात रुपांतर झाले. हे वादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे. परंतु पावसाची तीव्रता मात्र २४ तास कायम राहील. पुढील बारा तासात किनाऱ्यावर ताशी ५५ ते ६५ किलोमिटर वेगाने वारे वाहील आणि वाऱ्याचा वेग ताशी ७५ किमीपर्यंत पोहचू शकतो. नंतर वातावरण निवळणार असून पर्यटक २७ नंतर गोव्याला भेट देऊ शकतात.’ समुद्र प्रचंड खवळलेला असेल व त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. नद्या, नाल्यांची पातळी वाढली गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले. शुक्र वारी दिवसभर सूर्यदर्शन होऊ शकले नाही. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटून येत होते आणि मोठ्या थेंबाचा पाऊस कोसळत होता. सकाळी तर सर्वत्र अंधार दाटल्यासारखी स्थिती होती. रात्रभर अखंडपणे कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाल्यांची पाण्याची पातळी वाढली. चोडण, दिवाडी येथे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.