शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

गोव्यात ‘क्यार’ वादळाचा धोका टळला; पण अतिवृष्टीनं जनजीवन विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 18:44 IST

अनेक ठिकाणी पडझड; पूरस्थिती आणि वाहतुकीचीही कोंडी 

पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले ‘क्यार’ वादळ अखेर घोंघावत किनारपट्टीपासून नेमक्या उलट्या दिशेने पश्चिमेकडे वेगाने सरकत असून यामुळे किनारपट्टीवरील वादळाचा धोका टळला. मात्र अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे झालेली पडझड यामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाले. नद्या, नाल्यांची पातळी वाढल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच वीज पुरवठाही खंडित झाला. वाहनांची कोंडी होऊन रस्ते तुंबण्याचे प्रकारही घडले. हवामान वेधशाळेने समुद्रातील क्यार वादळाचा परिणाम म्हणून पुढील २४ तास राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वेधशाळेचे संचालक के. व्ही. पडगीलवार यांनी किनारपट्टीला वादळाचा धोका टळला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, समुद्रात कमी दाबाच्या पट्टयाचे पहाटे तीव्र वादळात रुपांतर झाले. हे वादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे. परंतु पावसाची तीव्रता मात्र २४ तास कायम राहील. पुढील बारा तासात किनाऱ्यावर ताशी ५५ ते ६५ किलोमिटर वेगाने वारे वाहील आणि वाऱ्याचा वेग ताशी ७५ किमीपर्यंत पोहचू शकतो. नंतर वातावरण निवळणार असून पर्यटक २७ नंतर गोव्याला भेट देऊ शकतात.’ समुद्र प्रचंड खवळलेला असेल व त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. नद्या, नाल्यांची पातळी वाढली गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले. शुक्र वारी दिवसभर सूर्यदर्शन होऊ शकले नाही. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ दाटून येत होते आणि मोठ्या थेंबाचा पाऊस कोसळत होता. सकाळी तर सर्वत्र अंधार दाटल्यासारखी स्थिती होती. रात्रभर अखंडपणे कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाल्यांची पाण्याची पातळी वाढली. चोडण, दिवाडी येथे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.