शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

देशातील विविध न्यायालयांमध्ये तब्बल ५ कोटी खटले प्रलंबित - किरेन रिजिजू 

By किशोर कुबल | Updated: March 6, 2023 19:13 IST

देशातील विविध न्यायालयांमध्ये तब्बल ५ कोटी खटले प्रलंबित आहेत असे किरेन रिजिजू यांनी म्हटले. 

पणजी : देशभरातील विविध न्यायालयांमध्ये ४.९८ कोटी खटले प्रलंबित असून ते हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. गोव्यात २३ व्या राष्ट्रकुल कायदा परिषदेत ते बोलत होते. राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. ९ मार्चपर्यंत ही आंतरराष्ट्रीय परिषद चालणार असून ५२ देशांचे ५०० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत.

रिजिजू म्हणाले की, ''आम्ही ई-कोर्ट आणि विशेष प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे. आमचे अंतिम लक्ष्य भारतीय न्यायव्यवस्था पेपरलेस करणे आहे. आगामी संसदीय अधिवेशनात ६५ अप्रचलित आणि अनावश्यक कायदे काढून टाकण्यासाठी विधेयके आणली जातील. गेल्या साडे आठ वर्षांच्या काळात १,४८६ अप्रचलित आणि अनावश्यक कायदे काढून टाकण्यात आले आहेत.'' 

किरेन रिजिजू म्हणाले की,‘ एक न्यायाधीश रोज सरासरी ५० ते ६० खटले हाताळू शकतो. प्रलंबित खटल्यांचे आव्हान पेलण्याशिवाय पर्याय नाही. सुशासन संकल्पनेचे अनेक पैलू आणि वैशिष्ट्ये आहेत. भ्रष्टाचार कमी करणे आणि दूर करणे आणि निर्णय घेताना समाजातील सर्वात असुरक्षित घटकांचा आवाज ऐकला जाणे हे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केवळ व्यवसायसुलभता नाही तर राहणीमान सुलभतेवर भर देऊन सुशासनाला चालना देण्याप्रती कटीबद्ध आहे. यामध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेचा मोठा वाटा आहे, असेही ते म्हणाले.

व्यवसायसुलभता आणि जीवन सुलभतेला चालना देत सरकारने १३ हजार क्लिष्ट नियम सुलभ केले आहेत आणि तर १२०० पेक्षा अधिक दस्तावेजांचे डिजीटल स्वरुपात जतन केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तंत्रज्ञानावर आधारीत (व्हर्च्युअल) न्यायालये, ई-सेवा केंद्र आणि उच्च न्यायालयांमधील माहितीडेस्क यासारख्या न्याय वितरणातील सामान्य लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी उचललेल्या विविध उपयांची कायदेमंत्र्यांनी माहिती दिली. 

 

टॅग्स :goaगोवा