शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

कदंबचे पास महागणार

By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST

पणजी : कदंब महामंडळासाठी ३00 ते ४00 कोटींचा कॉर्पस निधी उभारणार, अशी घोषणा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कदंब प्रवासाचे

पणजी : कदंब महामंडळासाठी ३00 ते ४00 कोटींचा कॉर्पस निधी उभारणार, अशी घोषणा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कदंब प्रवासाचे पास महागणार असल्याचे स्पष्ट केले. दोन वर्षांत बसगाड्यांची संख्या ८00 वर नेली जाईल, तसेच शारीरिकदृष्ट्या पात्र नसलेल्या सुमारे ७0 चालक-वाहकांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचे कठोर पाऊल सरकारला उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महामंडळाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील बसस्थानकावर आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. स्वेच्छा निवृत्ती देताना मानवतावादी दृष्टिकोन ठेवला जाईल. वैद्यकीय खर्चासाठी शक्य तितके सर्व लाभ त्यांना दिले जातील. ज्यांना इतर काम देणे शक्य आहे, त्यांचे काम बदलले जाईल, अशी पुस्तीही पर्रीकर यांनी जोडली. महामंडळासाठी कॉर्पस फंड उभा केला जाईल. या निधीच्या व्याजातून बऱ्याच गोष्टी करता येतील. हा निधी पुढील २0 वर्षे काढता येणार नाही, अशी कायदेशीर तरतूद केली जाईल. बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम केले जातील. राजधानी शहरातील बसस्थानकाचे काम प्राधान्यक्रमे हाती घेतले जाईल. कर्मचाऱ्यांना वेतनाचे सर्व लाभ, तसेच थकबाकीही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कदंबच्या ताफ्यात सध्या ५२२ बसगाड्या आहेत. येत्या दोन वर्षांत ही संख्या ८00 वर नेण्याचा मनोदय असल्याचेही ते म्हणाले. पास सेवेचा फेरआढावा घेण्यात आला असून नव्या अधिसूचनेनुसार आता ३0 टक्क्यांऐवजी ४0 टक्के रक्कम बाहेर काढावी लागणार आहे. शटल सेवेचे दरही वाढणार आहेत. यामुळे प्रवाशांना फटका बसणार असला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याचे समर्थन केले आहे. महागाई वाढली तरी तीन वर्षे तिकीटदर वाढले नव्हते, असा दावा त्यांनी केला. सध्या ४६ हजार पासधारक आहेत आणि शटल सेवेतच पास पद्धतीचा अधिकाधिक वापर होत आहे. नियमित बसगाड्यांच्या तुलनेत शटल सेवेचे दर कमी होते, असे आढळून आल्याने फेररचना करावी लागल्याचे ते म्हणाले. कदंबला सबसिडी ६0 टक्क्यांवरून वाढवून ७५ टक्के दिली जाईल, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. किलोमीटरमागे ८ रुपये तोटा : ढवळीकर तत्पूर्वी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सध्या कदंबला प्रती किलोमीटर ४५ रुपये खर्च येतो; परंतु उत्पन्न मात्र किलोमीटरमागे फक्त ३८ रुपये मिळते. प्रति किलोमीटर ८ रुपये होणारा तोटा भरून काढण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील. महिनाभरात सर्व गाड्यांना ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम बसविण्यात येतील, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येतील. जीपीएस सिस्टममुळे एखाद्या बसला वाटेत अपघात झाल्यास त्वरित त्याची माहिती कंट्रोल रुमला मिळेल आणि बस निश्चितपणे कोणत्या स्थळी (पान २ वर)