शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

कदंबचे पास महागणार

By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST

पणजी : कदंब महामंडळासाठी ३00 ते ४00 कोटींचा कॉर्पस निधी उभारणार, अशी घोषणा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कदंब प्रवासाचे

पणजी : कदंब महामंडळासाठी ३00 ते ४00 कोटींचा कॉर्पस निधी उभारणार, अशी घोषणा करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कदंब प्रवासाचे पास महागणार असल्याचे स्पष्ट केले. दोन वर्षांत बसगाड्यांची संख्या ८00 वर नेली जाईल, तसेच शारीरिकदृष्ट्या पात्र नसलेल्या सुमारे ७0 चालक-वाहकांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचे कठोर पाऊल सरकारला उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महामंडळाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील बसस्थानकावर आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. स्वेच्छा निवृत्ती देताना मानवतावादी दृष्टिकोन ठेवला जाईल. वैद्यकीय खर्चासाठी शक्य तितके सर्व लाभ त्यांना दिले जातील. ज्यांना इतर काम देणे शक्य आहे, त्यांचे काम बदलले जाईल, अशी पुस्तीही पर्रीकर यांनी जोडली. महामंडळासाठी कॉर्पस फंड उभा केला जाईल. या निधीच्या व्याजातून बऱ्याच गोष्टी करता येतील. हा निधी पुढील २0 वर्षे काढता येणार नाही, अशी कायदेशीर तरतूद केली जाईल. बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम केले जातील. राजधानी शहरातील बसस्थानकाचे काम प्राधान्यक्रमे हाती घेतले जाईल. कर्मचाऱ्यांना वेतनाचे सर्व लाभ, तसेच थकबाकीही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. कदंबच्या ताफ्यात सध्या ५२२ बसगाड्या आहेत. येत्या दोन वर्षांत ही संख्या ८00 वर नेण्याचा मनोदय असल्याचेही ते म्हणाले. पास सेवेचा फेरआढावा घेण्यात आला असून नव्या अधिसूचनेनुसार आता ३0 टक्क्यांऐवजी ४0 टक्के रक्कम बाहेर काढावी लागणार आहे. शटल सेवेचे दरही वाढणार आहेत. यामुळे प्रवाशांना फटका बसणार असला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याचे समर्थन केले आहे. महागाई वाढली तरी तीन वर्षे तिकीटदर वाढले नव्हते, असा दावा त्यांनी केला. सध्या ४६ हजार पासधारक आहेत आणि शटल सेवेतच पास पद्धतीचा अधिकाधिक वापर होत आहे. नियमित बसगाड्यांच्या तुलनेत शटल सेवेचे दर कमी होते, असे आढळून आल्याने फेररचना करावी लागल्याचे ते म्हणाले. कदंबला सबसिडी ६0 टक्क्यांवरून वाढवून ७५ टक्के दिली जाईल, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. किलोमीटरमागे ८ रुपये तोटा : ढवळीकर तत्पूर्वी वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, सध्या कदंबला प्रती किलोमीटर ४५ रुपये खर्च येतो; परंतु उत्पन्न मात्र किलोमीटरमागे फक्त ३८ रुपये मिळते. प्रति किलोमीटर ८ रुपये होणारा तोटा भरून काढण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील. महिनाभरात सर्व गाड्यांना ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम बसविण्यात येतील, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येतील. जीपीएस सिस्टममुळे एखाद्या बसला वाटेत अपघात झाल्यास त्वरित त्याची माहिती कंट्रोल रुमला मिळेल आणि बस निश्चितपणे कोणत्या स्थळी (पान २ वर)