शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दिगंबर कामतांना मुख्यमंत्री केले ही काँग्रेसची चूक होती! गिरीश चोडणकर यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2024 07:47 IST

चोडणकर दाबोळी विमानतळावरून पंजाबला रवाना झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : गोव्यात काँग्रेसच्या नुकसानीला दिगंबर कामत हेच जबाबदार आहेत. २००७ मध्ये कामत यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने पक्षाची वाताहात केली. त्यांच्यापूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर कधीच भ्रष्टाचाराचा आरोप झाला नव्हता. मात्र, जेव्हा दिगंबर कामत मुख्यमंत्री झाले, त्यानंतर भ्रष्टाचाराचे पेव फुटले. त्यांना मुख्यमंत्री करणे हीच काँग्रेसची सर्वांत मोठी चूक ठरली, अशी कबुली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

चोडणकर काल, मंगळवारी दाबोळी विमानतळावरून पंजाबला रवाना झाले. जालंदर-पंजाब लोकसभा निवडणुकीत पक्षाने गिरीश यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कामतांवर गंभीर आरोप केले. २००५ मध्ये दिगंबर कामत काँग्रेसमध्ये आल्यानंतर २००७ मध्ये त्यांना पक्षाने मुख्यमंत्री बनवले. त्यावेळी सुभाष शिरोडकर काँग्रेसचे अध्यक्ष होते व ते पक्ष शक्तीशाली बनवण्यासाठी पावले उचलण्याचे प्रयत्न करायचे. तर, मुख्यमंत्री असलेले कामत पक्षाला संपवण्यासाठी काम करू लागले होतो, असेही चोडणकर म्हणाले.

कामतांच्या हट्टामुळे सरकार बनले नाही!

कामत यांच्या पक्षविरोधी धोरणांमुळेच २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या आमदारांची संख्या ९ वर आली. २०१७ मध्ये सत्ताधाऱ्यांवरील रोष रोषामुळे काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले. मात्र, त्यावेळी कामत यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरल्यामुळे आमचे सरकार बनू शकले नाही, असा दावाही चोडणकर यांनी केला.

...अन् भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले

जेव्हा मी अध्यक्ष बनलो तेव्हासुद्धा पक्ष शक्तीशाली बनवण्यास दिगंबर कामत यांनी कधीच मदत केली नाही. मैत्रीच्या नावाखाली ते सतत भाजपच्याच संपर्कात होते. कामत यांच्यापूर्वी जे काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते, मात्र कामत येताच भ्रष्टाचाराला सुरुवात झाली, असा आरोपही चोडणकर यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस