शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रशियाकडून मिळणा-या 'S-400' सिस्टीममुळे अमेरिकेची रडारला न सापडणारी विमाने पाडणेही शक्य

By admin | Updated: October 15, 2016 17:18 IST

सर्वात महत्वाचा करार आहे S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. १५ - ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये शनिवारी झालेल्या व्दिपक्षीय चर्चेमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित १६ महत्वपूर्ण करार झाले. या करारांमध्ये सर्वात महत्वाचा करार आहे S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे. 
 
अलीकडच्या काळातील भारताचा हा सर्वात महागडा करार असून, ३९ हजार कोटी रुपयांच्या या करारामुळे भारताचे हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित होणार आहे. शत्रू देशांची लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रांना आपल्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट करण्याचे हे तंत्रज्ञान आहे. S-400 हे S-300 ची पुढची आवृत्ती आहे. रशियन लष्करामध्ये २००७ पासून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टमचा वापर सुरु आहे. 
 
आणखी वाचा 
 
रशियाकडे एस-५०० असल्यामुळे ते एस-४०० तंत्रज्ञान विकत आहेत. एस-४०० मध्ये तीन वेगवेगळया पल्ल्याची क्षेपणास्त्रे असून, या तंत्रज्ञानामुळे ४०० किलोमीटर क्षेत्रातील शत्रूचा हवाई हल्ला परतवून लावता येऊ शकतो. पाकिस्तान आणि चीनसारखे शेजारी असताना भारताला हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान कमालीचे उपयोगी पडणार आहे. भारताप्रमाणे चीनलाही रशिया एस-४०० एअर डिफेन्स सिस्टम देणार आहे. 
 
पश्चिमेला पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळ तीन एस-४०० सिस्टम आणि पूर्वेला चीनजवळ दोन सिस्टम तैनात करण्याचा भारताचा विचार आहे. अमेरिकेची सर्वात अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाची एफ-३५, एफ-२२ ही लढाऊ विमाने एस-४०० क्षेपणास्त्र पाडू शकते असा रशियन तज्ञांचा दावा आहे. एफ-३५, एफ-२२ रडारला सापडत नाहीत. शक्तीशाली रडार हे एस-४०० सिस्टमचे वैशिष्टय आहे.