शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

दारू दुकानांचा मुद्दा पेटणार

By admin | Updated: February 12, 2017 01:26 IST

पणजी : महामार्गांच्या बाजूची पाचशे मीटरमधील बार व दारूची दुकाने हटविण्याच्या आदेशावरून राज्यातील दारू व्यावसायिक आक्रमक

पणजी : महामार्गांच्या बाजूची पाचशे मीटरमधील बार व दारूची दुकाने हटविण्याच्या आदेशावरून राज्यातील दारू व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. सरकारने याप्रश्नी तोडगा काढला नाही, तर आम्ही प्रसंगी महामार्गांवर उतरून वाहतूकही रोखू, असा इशारा गोवा मद्य व्यापारी संघटनेतर्फे शनिवारी दिला. बार बंद केले तर, सुमारे चार लाख गोमंतकीयांच्या उपजीविकेवर गदा येईल आणि ७० टक्के व्यवसाय नष्ट होण्याचा धोका संभवतो, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यास अनुसरून येत्या १ एप्रिलपासून महामार्गांच्या बाजूचे बार व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करायचे नाही, असे अबकारी खात्याने ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथे शनिवारी गोवा मद्य व्यापारी संघटनेची व्यापक बैठक झाली. सुमारे ५०३ सदस्य या बैठकीस उपस्थित राहिले. नाईक यांच्यासह संघटनेचे कायदा सल्लागार अ‍ॅड. पालेकर, पदाधिकारी प्रवीण केरकर, विवेक केरकर, सॅड्रीक वाझ, मारियो सिक्वेरा, दिनेश केनावडेकर, इनासिवो डिसोझा, मंगलदास नाईक आदी या वेळी व्यासपीठावर होते. संघटनेने एकूण बारा सदस्यीय समिती शनिवारी स्थापन केली व महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरमध्ये किती दारू दुकाने आहेत ते निश्चितपणे आठवडाभरात शोधून काढण्यास या समितीला सांगितले आहे. बारा तालुक्यांतील प्रत्येकी एक सदस्य समितीवर घेतला आहे.बैठकीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आम्हाला मान्य नाही. महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरातील दारू दुकाने व बार हटविण्याचा निवाडा देण्यापूर्वी आमचे कोणाचेच म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. आम्हाला नोटीसही दिली गेली नाही. त्यामुळे या धंद्यातील सगळे गोमंतकीय अडचणीत आले आहेत. सरकारने यावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने काही तरी उपाययोजना करावी, अशी संघटनेची मागणी असल्याचे नाईक यांनी सांगितले. येत्या ११ मार्चनंतर जे नवे सरकार अधिकारावर येईल त्या सरकारकडे आम्ही विषयाचा पाठपुरावा करू, असेही नाईक यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)