शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

नोकऱ्यांचा विषय ठरला नाजूक..!

By admin | Updated: February 10, 2017 01:23 IST

आम्ही अनेक रोजगार संधी निर्माण करत आहोत. तरीही विधानसभा निवडणुकीत मला, पर्यायाने माझ्या पक्षासमोर सरकारी

पणजीआम्ही अनेक रोजगार संधी निर्माण करत आहोत. तरीही विधानसभा निवडणुकीत मला, पर्यायाने माझ्या पक्षासमोर सरकारी नोकऱ्यांबाबतचा विषय वारंवार उपस्थित झाला. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. तथापि, सरकारी नोकरी मिळावी अशीच धारणा बहुतेकांची असल्याचे प्रचारावेळी दिसून आले, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रथमच गुरुवारी पार्सेकर विविध मुद्द्यांबाबत बोलले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत पुढीलप्रमाणे :? मांद्रे मतदारसंघातील निवडणूक तुम्हाला कशी गेली?२०१२ साली मांद्रे मतदारसंघात मला जेवढ्या मतांची आघाडी मिळाली होती, तेवढीच या वेळीही मिळेल. मी सहज जिंकेन. प्रसारमाध्यमांना वस्तुस्थिती कळालेली नाही, त्यामुळे माझा पराभव होतोय अशी हवा तयार केली गेली. २०१२ सालीही माझ्या विरोधातील उमेदवाराने स्वत:चा विजय निश्चित मानून बेळगावचे बँड वगैरे निकालाच्या दिवशी तयार ठेवले होते. शिवाय इसवणाच्या शेकडो कापांचीही आॅर्डर दिली होती; मात्र विजय माझाच झाला. या वेळी मांद्रे मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत १३०० ज्यादा महिलांनी मतदान केले आहे. महिला व युवकांचे मतदान हे मांद्रे मतदारसंघातही भाजपसाठीच झालेले आहे. मगोपने उमेदवार उभा केला, तरी तो नावापुरता ठरला. निवडणूक प्रचारावेळी कोणते मुद्दे प्रामुख्याने महत्त्वाचे किंवा अडचणीचे ठरले?उत्तर : मांद्रे मतदारसंघात आणि इतरत्रही सरकारी नोकऱ्यांची अपेक्षा धरणारे अनेकजण भेटले. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. तथापि, एखाद्या घरात नोकरी दिल्यानंतर दुसऱ्या घरातील व्यक्ती आपल्याला नोकरी का मिळाली नाही असे विचारते, असा अनुभव आला. रोजगार संधी आम्ही मोठ्या प्रमाणात तयार करत आहोत. युवकांची अपेक्षा सरकारी नोकऱ्यांची आहे. सरकारी नोकऱ्या निर्मितीलाही मर्यादा असते.प्रश्न : महिलांचे वाढीव मतदान हे भाजपलाच झाले, असे तुम्हाला खरोखर वाटते का?उत्तर : ४० टक्के महिला आमच्यासोबत पूर्वी होत्याच. ६० टक्के महिला विरोधकांकडे असायच्या. तथापि, गृह आधार आणि अन्य कल्याणकारी योजनांमुळे दर महिन्याला महिलांना अर्थसाहाय्य मिळते. कोणत्याच महिन्यात त्याबाबत खंड पडलेला नाही. या प्रत्येक महिलेने भाजपलाच मत दिलेय असे मी म्हणत नाही; पण साठ टक्क्यांमधील किमान तीस टक्के महिलांनी निश्चितच भाजपला मत दिलेले असेल. अशा प्रकारे सत्तर टक्के महिलांचे मतदान हे भाजपच्या बाजूने झालेय, असा निष्कर्ष काढता येतो.प्रश्न : पेडणे मतदारसंघाविषयी काय वाटते?उत्तर : पेडणेतही भाजपचाच विजय होणार आहे, हे मी यापूर्वीच्या अनुभवावरून सांगतो. भाजपची सत्ता येईल हे निश्चित असल्याने लोक विद्यमान मंत्र्याचा पराभव कशाला म्हणून करतील. मतदारांना केवळ आमदार नको आहे, तर मंत्री हवा आहे. पेडणे तालुक्यात यापुढे उभा राहणारा आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ तसेच इलेक्ट्रॉनिक सिटी अशा प्रकल्पांमधून खूप मोठ्या संख्येने रोजगार संधी निर्माण होतील. हे प्रकल्प केवळ कागदोपत्री राहिलेले नाहीत. फिल्डवर त्याबाबत काम सुरू आहे.प्रश्न : मुख्यमंत्री म्हणून केंद्रातील नेता येऊ शकतो काय?उत्तर : काही दिवसांतच भाजपच्या कोअर टीमची बैठक होईल. त्या वेळी निवडणूक निकालाच्या दृष्टिकोनातून चर्चा करू. मी नुकताच दिल्ली भेटीवर जाऊन आलो. त्या वेळी एका मेजवानीच्या कार्यक्रमावेळी माझी भेट पक्षाचे अध्यक्ष अमित शहा व इतरांशी झाली; पण त्या वेळी काही चर्चा करता आली नाही. सध्या पक्षाचे सगळेच केंद्रीय नेते उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये व्यग्र आहेत.प्रश्न : विधानसभेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकते काय?उत्तर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता सर्व आमदारांचे भवितव्य सीलबंद झालेले असताना अधिवेशन बोलवावे हे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. विधानसभा अधिवेशन बोलावले नाही म्हणून विधानसभा विसर्जित करावी लागते काय, असे मला काहीजण विचारतात; पण मला तसे वाटत नाही. माझ्याकडे त्या विषयी आलेली फाईल मी अ‍ॅडव्होकेट जनरलांकडे सल्ल्यासाठी पाठवून दिली आहे. त्यांच्या सल्ल्याची मी प्रतीक्षा करत आहे. तथापि, सरकारचा काही दोष नसल्याने विधानसभा बरखास्तीची मला गरज वाटत नाही. निवडणुकीनंतर एक महिना निकाल राखून ठेवण्याचा निर्णय हा सरकारचा नव्हे, तो निवडणूक आयोगाचा आहे.