शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

खंडणी प्रकरणाची अखेर चौकशी सुरू; मुख्यमंत्री सावंत यांचे डीजीपींना तपासाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 11:36 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी या प्रकरणाबद्दल विचारले असता त्यांनी स्वतःच ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: किनारपट्टीवरील रेस्टॉरंट मालक, हॉटेलवाले यांच्याकडून सरकारच्या नावे कथित खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या 'त्या' दोघांना चौकशीसाठी बोलावण्याचे आदेश गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्रकारांनी या प्रकरणाबद्दल विचारले असता त्यांनी स्वतःच ही माहिती दिली. कळंगुट, कांदोळी, बागा, हणजूण भागातील रेस्टॉरंट मालकांकडून सरकारच्या नावे लाखो रुपयांची खंडणी उकळण्यात येत असल्याचा आरोप करणारी पत्रे काही व्यावसायिकांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिली आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, माझी या प्रकरणात नाहक बदनामी केली जात आहे. माझ्या कुटुंबातील एकाही सदस्याने कधीही सरकारच्या कामात ढवळाढवळ केलेली नाही. माझे सरकार स्वच्छ आहे. काही राजकारणी वैफल्यग्रस्त होऊन बोगस तक्रारी करत आहेत. पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात कथित खंडणी मागणाऱ्या ज्या दोघांचा उल्लेख आहे, त्यांची कसून चौकशी करण्यात यावी, असे आदेश मी दिलेले आहेत. तसेच ज्यांच्या सहीने ही पत्रे पाठविली गेली आहेत, त्यांनाही बोलावून विचारणा करावी, असे निर्देश डीजीपींना दिले आहेत.

दरम्यान, हॉटेल व्यावसायिक नंदन कुडचडकर तसेच साहिल अडवलपालकर पोलिसांकडे अशी तक्रार केली आहे की, पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेल्या पत्रांमध्ये त्यांच्या आडनावांचा कोणीतरी गैरवापर केलेला आहे. पत्रावरील सह्या त्यांच्या नाहीत.

काय आहे तक्रार?

खंडणीराजचे हे प्रकरण गेले तीन-चार दिवस गाजत आहे. किनारपट्टीवरील रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये रात्री १० नंतर म्युझिक लावले जाते. तसेच निर्बंध असतानाही रात्री उशिरापर्यंत मद्य, जेवण पुरविले जाते, असा आरोप करून हे प्रकार चालू ठेवायचे असतील तर खंडणी द्यावी लागेल, असे सांगत दोघांनी रेस्टॉरंट मालकांकडून सरकारच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप आहे. आमदार मायकल लोबो यांनीही खंडणीराजबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.

'तो' नंबर व्हिएतनामचा

खंडणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर आरोप करणारे जे पत्र व्हॉट्सअॅपवरून पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात आले, तो मोबाइल क्र. व्हिएतनाममध्ये नोंदणी झालेला आहे. ८४३३४३६४१२१ या क्रमांकावरून १६ मार्च रोजी हे पत्र अनेक मोबाइलवर पाठवण्यात आल्याचे सायबर क्राइम विभागाला चौकशीत आढळून आले आहे. सायबर पोलिस या प्रकरणी शोध घेत आहेत. हे कृत्य सायबर गुन्हेगारांचे किंवा असंतुष्टांचे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी कृत्य असावे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

सरकारची बदनामी खपवून घेणार नाही

सरकारची बदनामी खपवून घेणार नाही. कथित खंडणी प्रकरणी ज्या दोन व्यक्तींची नावे पत्राद्वारे चर्चेत आली, त्यांना पोलिसांनी बोलावून घेऊन चौकशी करावी. उगाच सरकारचे नाव कुणी गोवू नये. -सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

पणजी 'सोलर सिटी होणार 

राजधानी शहरात दोन वर्षांत ८० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून, हे शहर 'सोलर सिटी' म्हणून जाहीर केले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातील सर्व सरकारी इमारती, बंगले यांच्या छतांवर सौर पॅनेल्स बसवून वीज निर्मिती केली जाईल. शहराची विजेची गरज ८० मेगावॅट एवढी आहे. केंद्रीय अपारंपरिक उर्जा मंत्रालय व गेडा' यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाईल. कसिनो त्यांना लागणारी वीज अन्यत्र सोलर पॅनेल्स उभारुन करतील व तेथून त्यांना वीजपुरवठा केला जाईल. लोकांनी घरांवर सौर पॅनेल्स बसवून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करावी, याविषयी जनजागृती करण्यासाठी शहर व परिसरात रथ फिरणार आहे. या रथाला मुख्यमंत्र्यांनी बावटा दाखवला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत