शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अल्पसंख्याकांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी कारस्थान

By admin | Updated: May 27, 2016 02:54 IST

मडगाव : दुहेरी नागरिकत्वाखाली गोव्यातील सुमारे २१ हजार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क गमावला असून यासंंबंधी

मडगाव : दुहेरी नागरिकत्वाखाली गोव्यातील सुमारे २१ हजार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क गमावला असून यासंंबंधी जर घटना दुरुस्ती झाली नाही तर आणखी ६0 हजार मतदारांना आपल्या नागरिकत्वाचा हक्क गमवावा लागेल. अशा परिस्थितीत या नागरिकांना नागरिकत्वाची सुरक्षा मिळावी यासाठी दुरुस्ती विधेयक आणण्यासाठी एनडीए सरकार मुद्दामहून वेळकाढू धोरण स्वीकारत असल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी केला. गोव्यातील नागरिकांनी आपल्या जन्माची नोंदणी पोर्तुगालात केली तेव्हा त्यांना भारतीय नागरिकत्वावर पाणी सोडावे लागेल याची किंचितही कल्पना नव्हती. या कायद्याचा फटका बहुतेक अल्पसंख्याकांना बसणार आहे. कदाचित याचा फायदा भाजपला उठवायचा असेल तर दक्षिण गोव्यात असे मतदार जास्त आहेत. हे मतदार मतदानापासून वंचित झाल्यास भाजपला त्याचा फायदा होईल यासाठीच मुद्दामहून एनडीए सरकार ही चालढकल करीत नसावे ना, असा संशयही नाईक यांनी व्यक्त केला. गुरुवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक म्हणाले की, दुहेरी नागरिकत्वाखाली ज्या गोमंतकीयांचा नागरिकत्वाचा हक्क जातो तो अबाधित राहावा यासाठी आपण राज्यसभेत खासगी दुरुस्ती विधेयक आणले होते. मात्र, त्या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग व राज्यमंत्री किरेन रिजुजू यांनी यासंंबंधी सरकारतर्फे विधेयक आणले जाईल, अशी ग्वाही आपल्याला दिली होती. हे आश्वासन देऊन कित्येक काळ उलटला तरी त्यासंबंधात काही झालेले दिसत नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)