शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अंतर्गत वाद गेला न्यायालयात अन् मंदिरच पाडावे लागले; श्रीसातेरी देवीचे मंदिर ३ महिन्यात पाडण्याचा आदेश

By वासुदेव.पागी | Updated: November 7, 2023 15:55 IST

अशाच एका प्रकरणात गोव्यातील श्री सातेरी रवळनाथ देवीचे नव्याने बांधलेले मंदीर पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

वासुदेव पागी, पणजी : एखादा वाद जेव्हा सामंजस्याची भुमिका घेऊन आपसात मिटविण्याचे सर्व मार्ग संपतात, तेव्हा न्यायालयाची वाट धरली जाते. न्यायालयात प्रश्न मिटतात असे नाही, परंतु केलेल्या मेहनतीवर पाणीही पडू शकते. अशाच एका प्रकरणात गोव्यातील श्री सातेरी रवळनाथ देवीचे नव्याने बांधलेले मंदीर पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

धुळापी खोर्ली येथील श्रीसातेरी रवळनाथ देवस्थानचे नवीन बांधकाम पाडणयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे. देवस्थान समितीने मंदिराचे जुने बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम केल्यानंतर देवस्थान समितीचा एक गट  न्यायालयात गेला होता. नवीन बांधकाम बेकायदेशीर असल्याचे पुरावे याचिकादार पक्षाने न्यायालयात सादर केल्यामुळे तसेच प्रतिवादी पक्षाला बांधकामाच्या वैधतेचे पुरावे सादर करण्यास अपयश आल्यामुळे खंडपीठाने याचिकादाराच्या बाजुने निवाडा दिला. हे बांधकाम बेकायदेशीर ठरल्यामुळे ते ३ महिन्यांच्या कालावधीत पाडण्यात यावे असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात सुनावणी संपली होती  आणि केवळ निवाडा राहिला होता.  खंडपीठाने मंगळवारी सकाळी निवाडा सुनावला. 

बांधकाम पाडण्याचा आदेश देतानाच आणखी एक धक्का देवस्थानच्या अध्यक्षांना न्यायालयाने दिला आहे.  बांधकाम पाडण्यासाठी येणारा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष  भिकू धुळापकर यांनाच करावा लागेल असे आदेशात म्हटले आहे. ही याचिका निकालात काढण्च्ण्यात आली आहे. येथील श्री सातेरी रवळनाथ देवस्थानच्या बांधकामाच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. देवस्थान समितीतच दोन गट पडले होते. जुने मंदिर पाडून त्या जागी नवीन मंदिर उभारण्यास एका गटाने विरोध केला होता तर दुसऱ्या गटाने समर्थन दिले होते.

विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन बांधकाम करताना त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. वाद तेवढ्यावर थांबला नाही. या देवळात जेव्हा गेल्या मार्च महिन्यात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याच्या प्रसंगी हा वाद उफाळून आला होता. त्यामुळे प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला होता. या प्रकरणात मंदिराच्या बांधकामाच्या वैधतेचा मुद्दा उपस्थित करून एक गट अगोदरच न्यायालयात गेला होता. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय निवाडा देत नाही, तोपर्यंत मूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय