शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

अंतर्गत वाद गेला न्यायालयात अन् मंदिरच पाडावे लागले; श्रीसातेरी देवीचे मंदिर ३ महिन्यात पाडण्याचा आदेश

By वासुदेव.पागी | Updated: November 7, 2023 15:55 IST

अशाच एका प्रकरणात गोव्यातील श्री सातेरी रवळनाथ देवीचे नव्याने बांधलेले मंदीर पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

वासुदेव पागी, पणजी : एखादा वाद जेव्हा सामंजस्याची भुमिका घेऊन आपसात मिटविण्याचे सर्व मार्ग संपतात, तेव्हा न्यायालयाची वाट धरली जाते. न्यायालयात प्रश्न मिटतात असे नाही, परंतु केलेल्या मेहनतीवर पाणीही पडू शकते. अशाच एका प्रकरणात गोव्यातील श्री सातेरी रवळनाथ देवीचे नव्याने बांधलेले मंदीर पाडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

धुळापी खोर्ली येथील श्रीसातेरी रवळनाथ देवस्थानचे नवीन बांधकाम पाडणयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दिला आहे. देवस्थान समितीने मंदिराचे जुने बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम केल्यानंतर देवस्थान समितीचा एक गट  न्यायालयात गेला होता. नवीन बांधकाम बेकायदेशीर असल्याचे पुरावे याचिकादार पक्षाने न्यायालयात सादर केल्यामुळे तसेच प्रतिवादी पक्षाला बांधकामाच्या वैधतेचे पुरावे सादर करण्यास अपयश आल्यामुळे खंडपीठाने याचिकादाराच्या बाजुने निवाडा दिला. हे बांधकाम बेकायदेशीर ठरल्यामुळे ते ३ महिन्यांच्या कालावधीत पाडण्यात यावे असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात सुनावणी संपली होती  आणि केवळ निवाडा राहिला होता.  खंडपीठाने मंगळवारी सकाळी निवाडा सुनावला. 

बांधकाम पाडण्याचा आदेश देतानाच आणखी एक धक्का देवस्थानच्या अध्यक्षांना न्यायालयाने दिला आहे.  बांधकाम पाडण्यासाठी येणारा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष  भिकू धुळापकर यांनाच करावा लागेल असे आदेशात म्हटले आहे. ही याचिका निकालात काढण्च्ण्यात आली आहे. येथील श्री सातेरी रवळनाथ देवस्थानच्या बांधकामाच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. देवस्थान समितीतच दोन गट पडले होते. जुने मंदिर पाडून त्या जागी नवीन मंदिर उभारण्यास एका गटाने विरोध केला होता तर दुसऱ्या गटाने समर्थन दिले होते.

विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन बांधकाम करताना त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. वाद तेवढ्यावर थांबला नाही. या देवळात जेव्हा गेल्या मार्च महिन्यात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याच्या प्रसंगी हा वाद उफाळून आला होता. त्यामुळे प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला होता. या प्रकरणात मंदिराच्या बांधकामाच्या वैधतेचा मुद्दा उपस्थित करून एक गट अगोदरच न्यायालयात गेला होता. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय निवाडा देत नाही, तोपर्यंत मूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय