शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसा उल्लंघन करणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी म्हापशात नजरबंदी केंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 17:08 IST

राज्यात निवडणुकीसाठीची लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सदर केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार

म्हापसा : व्हिसा नियमांचे उल्लंघन करुन मुदत संपूनही बेकायदेशीरपणे गोव्यात वास्तव्य करुन राहणाऱ्या किंवा योग्य प्रकारची कागदपत्रे नसताना वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी म्हापशात तयार करण्यात आलेले नजरबंदी केंद्र सोमवार ६ मे पासून हंगामी तत्वावर कार्यान्वीत करण्यात येणार आहे. म्हापशातील जुन्या उपकारागृहाचे रुपांतर नजर बंदी केंद्रात करण्यात आले आहे. देशातील अशा प्रकारचे हे तिसरे केंद्र असणार आहे. 

राज्यात निवडणुकीसाठीची लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सदर केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण खात्याचे सचिव डब्लू. आर. मूर्ती यांनी पत्रकारांना दिली. सदर केंद्राची पाहणी करण्यासाठी त्यांच्यासोबत मुख्य सचिव परिमल राय, पोलीस महासंचालक प्रणब नंदा, महानिरीक्षक जसपाल सिंग, उपमहानिरीक्षक राजेश कुमार व परमादित्य, पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, खात्याचे संचालक वेनान्सीयो फुर्तादो, अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. 

 

मुख्य सचिव परिमल राय यांनी या नजरबंद केंद्राची उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यातील सुविधांचा आढावा घेतला. काही सुचना सुद्धा केल्या. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून चर्चा केली. घेतलेल्या बैठकीनंतर खात्याचे सचिव डब्लू. आर. मूर्ती यांनी सदर केंद्र सोमवार पासून हंगामी तत्वावर सुरु केले जाणार असल्याचे सांगितले. त्यात २३ जणांना ठेवण्यासाठीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एकंदरीत १५ पुरुष तसेच ८ महिलांची वेगवेगळी सोय करण्यात आली आहे. आकडा वाढल्यास अतिरिक्त सोय करण्याची सुविधा सुद्धा त्यात उपलब्ध असल्याचे मूर्ती म्हणाले. सदरचा आकडा वाढवण्यास पोलिसांकडून योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. 

अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर केंद्रात मुदत संपून वास्तव्य करु राहणाºया विदेशी नागरिकांना त्यात ठेवले जाणार आहे. त्यांना ठेवलेल्या ठिकाणी फक्त संबंधीत देशातील राजदूत कार्यालयातील अधिकाºयांना प्रवेश दिला जाणार आहे. संबंधीतांनी योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. या पूर्वी देशात दिल्ली, लक्षव्दीप येथे अशा प्रकारची केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दर वर्षी किमान २०० च्या आसपास विदेशाी नागरिकांना ताब्यात घेतले जाते. 

टॅग्स :goaगोवा